शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळमध्ये तलाव आटले

By admin | Updated: November 23, 2015 00:31 IST

पाण्याचा प्रश्न गंभीर : पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

अर्जुन कर्पे -- कवठेमहांकाळ तालुक्यातील ११ तलावांपैकी ७ तलावांतील पाणीसाठा येत्या आठवडाभरात आटण्याच्या मार्गावर असून, उर्वरित ४ तलावांतील पाणीसाठा १५ दिवस पुरेल एवढाच शिल्लक राहिलेला आहे. तसेच ९0 टक्के रब्बीची पेरणी झालेले क्षेत्र पाण्याअभावी व पावसाअभावी वाया जाणार आहे. तालुक्यात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, येत्या १५ दिवसांनंतर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर येणार आहे. या सर्व प्रश्नांकडे प्रशासन असो की, राजकीय प्रतिनिधी असोत, डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामानंतर किमान नोव्हेंबरपर्यंत तरी पाऊस येईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता आणि रब्बी हंगाम सुरळीत पार पडेल असे वाटत होते. तालुक्यातील शेतकऱ्यांनी तेवीस हजार नऊशे सहासष्ट हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी एकवीस हजार पाचशे सत्त्याहत्तर हेक्टरवर रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा, सूर्यफूल, करडई आदी गळीत धान्याची एकूण ९0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली. या रब्बी हंगामात पाऊस येईल अथवा ‘म्हैसाळ’चे पाणी मिळेल, या आशेवर शेतकरी होता. परंतु शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. ना पाऊस आला, ना ‘म्हैसाळ’चे पाणी. त्यामुळे रब्बी हंगाम पूर्णपणे वाया जाण्याच्या अवस्थेत आला. तालुक्यात ११ तलावांतील जो उपलब्ध पाणीसाठा आहे, तोही १५ डिसेंबरपर्यंतच पुरणार आहे. यापैकी ७ तलावांतील पाणीसाठा पूर्णपणे गाळापर्यंत पोहोचला आहे; तर उर्वरित ४ तलावांतील पाणीसाठा फक्त १५ डिसेंबरपर्यंतच पुरेल इतका आहे. त्यामुळे हे उपलब्ध पाणी फक्त पिण्यासाठी उपयोगी पडणार आहे. याचा शेतीला काहीही उपयोग होणार नाही. तसेच म्हैसाळ योजनेचे १८ कोटी रुपये वीज बिल थकित असल्याने म्हैसाळ योजना ही सध्या बंद आहे. त्यामुळे वीज बिल भरल्याखेरीज म्हैसाळचे पाणी शेतीला मिळणार नाही. त्यामुळे रब्बी हंगामही तरणार नाही. एकूणच पाण्याअभावी शेतीचे व शेतकऱ्यांचे मोठे हाल सुरू झाले आहेत.तलावक्षमता उपलब्ध पाणी कुची७९.0५८.६रायवाडी७६.६० ३२.१४ लांडगेवाडी ३७.0३१.0५लंगरपेठ ७८.३९११.८८नांगोळे४५.८५१७.८९बोरगाव५७.७११.७५दुधेभावी १४०.६३१५.0५ घोरपडी ५३.२७ 0.0४बंडगरवाडी ७२.६१३९.६८बसाप्पाचीवाडी २७४.५७ १८१.१४पाणी नाही : उत्पादन खर्च निघणेही कठीणयावर्षी कवठेमहांकाळ तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे खरीप हंगामही कसाबसा शेतकऱ्यांनी घेतला. खरीप हंगामात ‘म्हैसाळ’चे पाणी थोड्या प्रमाणात आले. परंतु ते बेभरवशाचे ठरले. नियमितपणे खरीप हंगामात ‘म्हैसाळ’चे पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पूर्णपणे हतबल झाला. साधा उत्पादन खर्चही खरीप हंगामात त्याला मिळू शकला नाही.