शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंब, द्राक्ष बागायतदार संकटात

By admin | Updated: September 8, 2015 22:40 IST

बागांच्या छाटण्या रखडल्या : पाण्याअभावी डाळिंबाच्या फळधारणेबाबत प्रश्नचिन्ह

गजानन पाटील -- संख  -पावसाने दिलेली दडी, कमी झालेली पाण्याची पातळी, कोरड्या पडलेल्या विहिरी व कूपनलिका यामुळे जत तालुक्यातील द्राक्षे व डाळिंब फळबागा संकटात सापडल्या आहेत. द्राक्षबागांच्या छाटणीची कामे खोळंबून राहिली आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये डाळिंबाच्या फळधारणा हंगामावर पुरेशा पाण्याअभावी संकट आले आहे. द्राक्ष बागायतदारांनी एप्रिल महिन्यापासून काड्या तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. तसेच डाळिंबाचा हंगाम धरण्यासाठीही शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च केले आहेत. पण पावसाअभावी द्राक्षे, डाळिंब फळबागांवर फळधारणेचे प्रश्नचिन्ह लागले आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त बनला आहे.तालुक्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करीत ठिबक सिंचन, मडकी सिंचनाच्या साहाय्याने उजाड अशा फोंड्या माळरानावर फळबागा उभारल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यामध्ये ४ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत.उमदी, तिकोंडी, भिवर्गी, बिळूर, संख, डफळापूर, सिद्धनाथ, जालिहाळ बु।।, रामपूर, कोंतेवबोबलाद, जालिहाळ खुर्द, अमृतवाडी, दरीकोणूर, अंकलगी, करजगी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे. विहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुटे खाण बेदाण्याची निर्मिती केली जात आहे.तालुक्यातील बागायतदार तीन टप्प्यात द्राक्षाची छाटणी घेतो. अंकलगी, संख, अमृतवाडी, मुचंडी परिसरातील काही बागायतदार आगाप सप्टेंबर महिन्यामध्ये द्राक्ष छाटणी करतात. डिसेंबर महिन्यामध्ये द्राक्षे बाजारात येतात. त्याला दर पण चांगला मिळतो. त्यानंतर बहुतांशी बागायतदार दुसऱ्या टप्प्यात आॅक्टोबर, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत छाटणी घेतात.पूूर्व भागातील तिकोंडी, भिवर्गी, संख परिसरातील द्राक्षबागांची छाटणी डिसेंबरमध्ये केली जाते. हा माल एप्रिल-मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बाजारात येतो. अनुकूल वातावरणामुळे दावण्या, भुरी रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो. एकरी १५ ते २० टन कच्चा माल काढला जातो. साखर १०० टक्के भरते. बेदाण्यापेक्षा मार्केटिंगची द्राक्षे परवडतात, असे बागायतदारांचे मत आहे. जोरदार अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा धोका असतो. हा धोका पत्करून द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. द्राक्ष बागायतदारांनी एप्रिल-मे महिन्यापासून काड्या तयार करण्याचे काम सुरू केले आहे. फुटवा खुडणे, शेंडा खुडणे, सेंद्रीय, रासायनिक खते, माती टाकणे, औषध फवारणीची कामे केलेली आहेत. पाऊस नसल्यामुळे पाणी पातळी कमी झाली आहे.पावसाअभावी द्राक्षांच्या छाटण्या खोळंबून राहणार आहेत. छाटण्या केल्या तर पाणी कमी पडणार आहे. दमदार पाऊस झाला तरच यावर्षी द्राक्षे, डाळिंबाची फळधारणा होणार आहे. अन्यथा नाही. आम्ही पावसाच्या प्रतीक्षेत आहोत.-विलास शिंदे,द्राक्षे व डाळिंब बागायतदारकर्जाची परतफेड कशी होणार ? सोसायटी, बॅँकांकडून शेतकऱ्यांनी बागांवर कर्जे काढली आहेत. बागांचे उत्पादन येईल की नाही याची शाश्वती नसल्याने कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस पडतो की नाही याची शाश्वती नसल्याने सप्टेंबर महिन्यातील छाटण्या खोळंबल्या आहेत. या महिन्यात छाटणी घेण्याच्या मन:स्थितीत शेतकरी नाहीत. पुरेसा पाऊस पडला, तर छाटण्या सुरू होणार आहेत. कमी पाण्यावर, कमी मशागतीच्या खर्चात, डाळिंबाचे पीक उत्पादन घेतले जाते.