शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

सांगली जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा, किती शेतकरी लाभापासून वंचित..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:08 IST

तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून मिळतात पैसे

सांगली : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील चार लाख ७३० शेतकरी घेत आहेत. पीएम किसान योजनेत वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. या योजनेत शेतकऱ्यांना १९ वा हप्ता नुकताच वितरित करण्यात आला असून, जिल्ह्यातील चार लाख ७३० शेतकऱ्यांच्या खात्यावर ८० कोटी १४ लाख ६० हजार रुपये जमा झाले आहेत.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रत्येक हप्त्याला २ हजार प्रमाणे वर्षाला ३ हप्ते म्हणजे ६ हजार रुपयांचा लाभ दिला जातो. याचा लाभ डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जातो. केंद्र शासनाकडून १९ हप्त्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे. हा लाभ नियमित मिळण्यासाठी दरवर्षी केवायसी करणे बंधनकारक असते.मात्र, शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश देऊनही हजारो शेतकरी लाभापासून दूर आहेत. जिल्ह्यात पीएम किसान योजनेसाठी चार लाख ११ हजार ३४३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी तीन हजार ३५२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही. यामुळे त्यांना पीएम किसान योजनेपासून वंचित राहावे लागले. उर्वरित चार लाख ७३० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ८० कोटी १४ लाख ६० हजार रुपये जमा केले आहेत.

तालुकानिहाय पीएम किसानचे लाभार्थीतालुका - शेतकरी संख्याआटपाडी - २६,८०९जत - ७०,४२७कडेगाव - ३२,३३५क. महांकाळ - २८,९११खानापूर - २२,७५४मिरज - ५३,३८८पलूस - २२,८७६शिराळा - ३६,६८२तासगाव - ४१,१३१वाळवा - ६५,४१७एकूण - ४,००,७३०

जिल्ह्यात ३,३५२ शेतकरी लाभापासून वंचितजिल्ह्यात पीएम किसान योजनेसाठी चार लाख ११ हजार ३४३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. पण, वारंवार सूचना देऊनही तीन हजार ३५२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही, त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. याचसोबत ज्या शेतकऱ्यांनी नियमाबाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यातील तीन हजार ३५२ शेतकऱ्यांनी ई-केवायीसी पूर्ण केली नाही. या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे.

काय आहे शासनाची किसान सन्मान योजना?

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने बनविलेली एक कल्याणकारी योजना आहे.
  • या योजनेंतर्गत २ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या देशभरातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये याप्रमाणे अनुदान दिले जाते.
  • ही रक्कम वर्षभरात तीन हप्त्यांत म्हणजे चार महिन्यांनी एक हप्ता याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. त्यातील प्रत्येक हप्ता हा २ हजार रुपयांचा असतो.
टॅग्स :SangliसांगलीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीbankबँक