शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आमचे सरकार दिल्लीपुढे नाही झुकणार; नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 5:23 AM

एवढे नीटनेटके कार्यालय राज्यात किंवा देशात नसेल. शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा शब्द दिला होता, तो सत्तेत आल्यानंतर पूर्ण केला आहे.

इस्लामपूर (जि. सांगली) : चार महिन्यांपूर्वी युतीत होतो. शिवसेनेची सोबत होती, म्हणूनच केंद्रात भाजपचे सरकार आले. केंद्राचे सरकार देशाचे पालक असते. महापुरासह अस्मानी संकटाने प्रचंड नुकसान झाले. अशावेळी पालक म्हणून मदत करण्याऐवजी ते त्याला नकार देत आहेत. मात्र आम्ही पडेल ती किंमत मोजून शेतकºयाला मदत करू. यासाठी दिल्लीपुढे झुकणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला.

इस्लामपूर येथील महसूल विभागाच्या नूतन तहसील कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्याहस्ते झाले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते.

ठाकरे म्हणाले की, एवढे नीटनेटके कार्यालय राज्यात किंवा देशात नसेल. शेतकºयांच्या कर्जमुक्तीचा शब्द दिला होता, तो सत्तेत आल्यानंतर पूर्ण केला आहे. आता दोन लाखांवरील कर्ज आणि नियमित शेतीकर्ज फेडणाºया शेतकºयांनाही दिलासा देणार आहोत. देशाची अर्थव्यवस्था कोमात गेल्याचे अर्थतज्ज्ञ सांगतात. ती कोणामुळे गेली हे सर्वांना माहीत आहे. आता तिला बाहेर काढण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. रोजगार निर्मितीसाठी उद्योगधंद्यांचे जाळे विस्तारायला हवे. देशातील सर्वात मोठे उद्योगपती महाराष्ट्रातील मुंबईत राहतात. त्यामुळे रोजगार निर्मितीच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल.

जलसंपदामंत्री पाटील म्हणाले , राजारामबापूंच्या पुण्यतिथीदिनी विधायक कामे सुरू करण्याची आमची परंपरा आहे. भविष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा भविष्य घडविणारी आमची पिढी या तालुक्यात निर्माण झाली आहे. दोन-अडीच वर्षांपूर्वी इमारत तयार होऊनही तिचा वापर होत नव्हता. त्यामुळे कोणाच्याहस्ते उद्घाटन करून घ्यायचे, हे इमारतीनेच ठरवले होते. त्याला मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांचे हात लागले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे