शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

मानसिक आरोग्य दिन विशेष; विद्यार्थ्यांच्या मोबाईल व्यसनमुक्तीसाठी सांगली जिल्हा परिषदेची मोहीम

By संतोष भिसे | Updated: October 9, 2022 21:50 IST

मोबाईलचे व्यसन जडलेल्या मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी जिल्हा परिषदेने मोहीम हाती घेतली आहे.

सांगली : कोरोना व लॉकडाऊन काळात मुलांच्या शिक्षणासाठी मोबाईल अपरिहार्य बनला. पण तोच आता पालकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे. मोबाईलचे व्यसन जडलेल्या मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी जिल्हा परिषदेने मोहीम हाती घेतली आहे.

सोमवारी मानसिक आरोग्य दिनी मोहिमेची सुरुवात होईल. माध्यमिक शिक्षण विभाग व इस्लामपुरातील सुश्रूषा संस्थेतर्फे ७६६ माध्यमिक शाळांत मोबाईलविषयक सर्वेक्षण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन मानसशास्त्रीय मापन केले जाणार आहे. यातून मोबाईलच्या व्यसनात अडकलेल्या मुलांची निश्चित संख्या व व्यसनाचे गांभीर्य स्पष्ट होणार आहे.

मोबाईलमुक्तीसाठी तज्ज्ञांमार्फत समुपदेशन केले जाईल. शिक्षक प्रशिक्षण, पालकांचे प्रबोधन, जनजागृती आदी उपक्रम वर्षभर राबविले जातील. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चाैगुले यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेत उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे, माधुरी गुरव, पोपट मलगुंडे, कक्ष अधिकारी उल्हास भांगे, मानसतज्ज्ञ क्रांती गोंधळी, तेजस्विनी पाटील, सूरज कदम, प्रियांका सरतापे, वसुंधरा पाटील, कालिदास पाटील यांचा सहभाग असेल.

याच्या होतील नोंदी -- मुलांचा मोबाईलमध्ये जाणारा वेळ- पाहिली जाणारी संकेतस्थळे- अभ्यासाव्यतिरिक्त होणारा वापर- कार्टून, मनोरंजन, संशोधन व आक्षेपार्ह माहितीसाठी वापर- मोबाईल वापरात पालकांचा होणारा हस्तक्षेप- मोबाईल बंद केल्यास वागणुकीत होणारे बदल

८५ टक्के मुलांमध्ये चिडचिडेपणा -कालिदास पाटील यांच्या ‘सुश्रुषा’ संस्थेने जिल्ह्यातील १५ वर्षांपर्यतच्या ८ हजार ८९२ मुला-मुलींचे मोबाईलच्या दृष्टीने मानसशास्त्रीय सर्वेक्षण केले. त्यातून ८५ टक्के मुलांत चिडचिडेपणा, ५७ टक्के मुलांमध्ये टोकाचा संताप, ५२ टक्के मुलांमध्ये भुकेच्या तक्रारी तर ५१ टक्के मुलांमध्ये अतिचंचलता आढळली.

पालकांनी मुलांच्या वर्तनाकडे व भावनिक समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. कोणत्याही अंधश्रध्देच्या आहारी न जाता मानसतज्ज्ञांची मदत घ्यावी. - सुभाष चौगुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी                                                      

मुलांच्या मनावर झालेला परिणाम शारीरिक अस्वस्थतेतून दिसून येतो. मुले शब्दांतून, बोलण्यातून व्यक्त होतीलच असे नाही. त्यामुळेच त्यांच्या मानसिकतेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.- कालिदास पाटील, सचिव, मराठी मानसशास्त्र परिषद, पुणे

शिक्षण व्यवस्थेते मुलांच्या मानसिक व भावनिक विकासाला महत्व द्यायला हवे. ऑनलाईन शिक्षणातून डोक्यात केवळ माहितीचा साठा वाढवू नये. कुटुंबात व शाळेत मुलांचे भावनिक विश्व जपल्यास आत्महत्या व गुन्हेगारी कमी होईल.- डॉ. संदीप शिसोदे, अध्यक्ष, राज्य मानसतज्ज्ञ असोसिएशन

टॅग्स :Studentविद्यार्थीTeacherशिक्षकSchoolशाळा