शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गावात कुपोषण, शहरात अतिपोषण; कोरोनाकाळात मुलांचे वजन वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळांना लागलेली सुटी आणि त्यामुळे ‘घरकोंबडा’ झालेल्या मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळांना लागलेली सुटी आणि त्यामुळे ‘घरकोंबडा’ झालेल्या मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या अधिक तीव्रपणे जाणवत आहे. ग्रामीण भागात कुपोषण व तीव्र कुपोषणाचे प्रमाण अद्यापही असले तरी शहरात मात्र, मुलांचे वजन वाढताना दिसत आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याच्या नवीन समस्यांना पालकांना तोंड द्यावे लागत आहे.

शाळा सुरू असल्यानंतर मुलांच्या हालचाली होत असतात. मात्र, सध्या पूर्ण शाळा बंद असल्याने घराबाहेर पडणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी आहे. त्यात कोरोना संसर्गाची भीती असल्याने पालकांकडूनही मुलांची काळजी घेताना, त्यांना मैदानावर जास्त सोडले जात नाही. घरात बसून असल्याने फास्ट फूड खाण्याचेही प्रमाण वाढल्यानेही कुपोषणाची नवीन समस्या समोर येत आहे.

चौकट

स्थूलता ही नवीन समस्याच

ग्रामीण भागात शाळा बंद असल्यातरी मुले शेतात किंवा गावात फिरून क्रयशक्ती कायम ठेवतात. मात्र, त्याच्या उलट शहरातील मुले घराबाहेर पडत नसल्याने त्यांच्यात वजनवाढीची समस्या जाणवत आहे. त्यामुळे शहरात स्थूलताही नवीन समस्या मुलांमध्ये जाणवत आहे.

कारणे काय?

१) हालचाल मंदावल्याने मुलांना घरात टीव्हीसमोर बसून वेळ काढावा लागतो. शिवाय ऑनलाईन शिक्षणामुळेही मुलांमध्ये हालचाल खूपच कमी झाली आहे.

२) दीड वर्षापासून घरातच असलेल्या मुलांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीत मोठा बदल झाला आहे. बाहेरचे चमचमीत खाण्यावर मर्यादा आल्याने अनेकदा घरातच असे पदार्थ वारंवार बनवले जात असून, त्यामुळे मुलांमध्ये स्थूलता वाढत आहे.

३) मुलांचे केवळ ऑनलाईन शिक्षण व त्यानंतरचा वेळ मोबाईल, टीव्हीमध्ये जात असल्याने एकलकोंडे बनलेल्या मुलांत आरोग्यविषयक जनजागृती कमी झाल्यानेही समस्या जाणवत आहे.

चौकट

षडरस आहारच योग्य

सध्या मुलांसह कुटुंबातील प्रत्येकाच्या आहारात प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा समावेश अधिक आहे. पाेषणमूल्ये कमी होऊन मुलांमधील वजन वाढत आहे. त्यामुळे आहारात षडरस असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तिखट, आंबट, गोड, कडू, तुरट आणि खारट असे सर्व चवीचे पदार्थ जेवणात असल्यास कुपोषण टळणार आहे.

चौकट

तज्ज्ञ काय म्हणतात

कोट

पोषणमूल्यांनी भरपूर आहार असल्यास कुपोषण जाणवणार नाही. यासाठी पारंपरिक पद्धतीच्या जेवणावर भर द्यावा. कॅलरीज आणि प्रोटिनच्या मागे न लागता वरण, भात, चटणी, कोशिंबीर आदी पदार्थांतूनही तीच पोषकतत्त्वे मिळत असल्याने आहार कायम ठेवल्यास मुलांना कोणतीच समस्या जाणवणार नाही.

डॉ. योगेश माईनकर, आयुर्वेदिक तज्ज्ञ