शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राची अधोगती म्हणता मग २५ सभा का घेता

By admin | Updated: October 12, 2014 23:33 IST

सुप्रिया सुळे : नरेंद्र मोदी यांच्यावर कोल्हापुरात टीका

कोल्हापूर : ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ म्हणता मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना २५ सभा का घ्याव्या लागतात? महाराष्ट्र मागासलेला आहे, तर पंतप्रधानांसह अर्धा डझन केंद्रीय मंत्री तळ ठोकून का? असा खोचक सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला. मोदींकडे आम्ही १०० दिवसांचा हिशेब मागत नाही, पण त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांचा जाब विचारत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेल्या कामांचे उद्घाटन मोदी करत आहेत. महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे घेऊन जाण्याची भाषा काही मंडळी वापरत आहेत, हे गुजरातमधील जनतेवर अन्याय नाही का? असा सवालही त्यांनी केला. ‘युपीए’ सरकार असताना कांद्याचे दर पडले, महागाई वाढली तरी शरद पवार यांच्या नावानेच ओरड सुरू असायची, आता ओरड करणारी मंडळी कुठे आहेत. व्यवस्था दोन-चार महिन्यांत बदलत नाही, एवढे आम्हालाही समजते, पण सरकार आल्यानंतर एका शहीद जवानासाठी पाकिस्तानची शंभर डोकी देशात आणू म्हणणाऱ्या सुषमा स्वराज्य आता कुठे आहेत? सीमेवर तणावाचे वातावरण असताना केंद्रातील मंत्री महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात मग्न असल्याची टीकाही त्यांनी केली. केंद्रात सत्तेत राहायचे आणि महाराष्ट्रात अफजलखानाची उपमा देणाऱ्यांनी कोण अफजलखान, याचे उत्तर महाराष्ट्राला द्यावे, अशी उद्धव ठाकरेंवर टीका करत येडियुरप्पासारखे येथे येऊन प्रचार करणार असतील, तर ही मंडळी महाराष्ट्र काय चालविणार, असा सवालही उपस्थित केला. आर. आर. यांचे ‘ते’ वक्तव्य दुर्दैवीआर. आर. पाटील यांनी केलेले ‘ते’ वक्तव्य दुर्दैवी आहे. याबद्दल शरद पवार यांनीही खंत व्यक्त केली आहे. ‘आर. आर.’ यांनीही दिलगिरी व्यक्त केल्याने हा विषय संपविला पाहिजे. प्रसारमाध्यमांनी हा विषय टोकाचा करू नये, असेही सुळे यांनी सांगितले. माझे व अजितदादांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आम्ही एवढे कोत्या मनाचे नाही. लाल दिव्यासाठी भांडत बसणारे संस्कार आमच्यावर नाहीत. जिथे भाऊ शेजारी नसेल तो लाल दिवा काय कामाचा? असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले.