शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election 2019 : शागिर्दांच्या खडाखडीत वस्तादांची नुरा कुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 04:30 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणून इस्लामपूरमध्ये एकास एक उमेदवार देण्याचे प्रयत्न फसले.

- श्रीनिवास नागेसांगली जिल्ह्यातील आठपैकी तीन जागांवर तिरंगी, तर पाच ठिकाणी दुरंगी सामना रंगणार आहे. तीन जागांवर वर्षभर तयारी केलेले तगडे उमेदवार असतानाही भाजपने त्या जागा शिवसेनेला का सोडल्या आणि स्वत:कडे ताकदीचे उमेदवार नसतानाही शिवसेनेने त्या जागा का घेतल्या, या प्रश्नाने मात्र जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणून इस्लामपूरमध्ये एकास एक उमेदवार देण्याचे प्रयत्न फसले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे हेवेदावे उफाळून आले. खोत यांचे नाव मागे पडले, पण त्यांनी गौरव नायकवडी यांचे नाव पुढे केले. त्यातच ही जागा शिवसेनेकडे गेली. सेनेने भाजपचे इच्छुक नायकवडी यांनाच तिकीट दिले. आता निशिकांत पाटीलही अपक्ष म्हणून लढत आहेत.पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसकडून विश्वजित कदम आणि भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांच्यातील टक्कर अपेक्षित होती, मात्र ही जागाही शिवसेनेकडे गेली आणि हा सामना टळला. देशमुख रिंगणाबाहेर राहिले.तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्टÑवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्याविरोधात शिवसेनेने भाजपमधूनच आयात केलेल्या अजितराव घोरपडेंना उभे केले. या तीन जागा भाजपने का सोडल्या? तयारी केलेल्या शागिर्दांची खडाखडी सुरू असताना ‘वर’चे वस्ताद नुरा कुस्ती करत आहेत का, हा सवाल उपस्थित होत आहे. मिरजेत भाजपचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्याविरोधात काँग्रेस आघाडीला उमेदवाराची शोधाशोध करावी लागली. सांगलीत भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासमोर काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांनी आव्हान उभे केले आहे.प्रचारातील प्रमुख मुद्दे१) रखडलेल्या सिंचन योजना आणि त्यांना मिळणारा निधी हा मुख्य मुद्दा असेल.२) महापुराच्या काळात पूरग्रस्त भागात मंत्री, भाजपचे खासदार-आमदार यांची अनुपस्थिती आणि प्रशासनाला आलेले अपयश यावरून विरोधक रान पेटवतील. ३) मोठ्या उद्योगांची कमतरता-रोजगार, खराब रस्ते हे मुद्देही प्रचारात असतील.रंगतदार लढतीखानापूर मतदारसंघात यंदाही ‘हाय व्होल्टेज’ सामना होत आहे. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील लढत आहेत, पण अपक्ष म्हणून! येथे काँग्रेस आघाडीने उमेदवार दिलेला नाही. बाबर यांच्या सर्व विरोधकांची ताकद पाटील यांच्यामागे आहे.जतमध्ये भाजपचे आमदार विलासराव जगताप यांना विश्वजित कदम यांचे मावसभाऊ विक्रम सावंत यांनी काँग्रेसकडून आव्हान दिले आहे, तर भाजपमधील नाराज गट, राष्टÑवादी, जनसुराज्य शक्ती आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन भाजपचे बंडखोर डॉ. रवींद्र आरळी यांना उतरवले आहे.शिराळ्यामध्ये भाजपकडून आमदार शिवाजीराव नाईक आणि राष्टÑवादीकडून मानसिंगराव नाईक हे प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. भाजपशी संलग्न असलेल्या विकास आघाडीतील सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केल्याने चुरशीची तिरंगी लढत पहायला मिळत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस