शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

Maharashtra Election 2019 : शागिर्दांच्या खडाखडीत वस्तादांची नुरा कुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 04:30 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणून इस्लामपूरमध्ये एकास एक उमेदवार देण्याचे प्रयत्न फसले.

- श्रीनिवास नागेसांगली जिल्ह्यातील आठपैकी तीन जागांवर तिरंगी, तर पाच ठिकाणी दुरंगी सामना रंगणार आहे. तीन जागांवर वर्षभर तयारी केलेले तगडे उमेदवार असतानाही भाजपने त्या जागा शिवसेनेला का सोडल्या आणि स्वत:कडे ताकदीचे उमेदवार नसतानाही शिवसेनेने त्या जागा का घेतल्या, या प्रश्नाने मात्र जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणून इस्लामपूरमध्ये एकास एक उमेदवार देण्याचे प्रयत्न फसले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे हेवेदावे उफाळून आले. खोत यांचे नाव मागे पडले, पण त्यांनी गौरव नायकवडी यांचे नाव पुढे केले. त्यातच ही जागा शिवसेनेकडे गेली. सेनेने भाजपचे इच्छुक नायकवडी यांनाच तिकीट दिले. आता निशिकांत पाटीलही अपक्ष म्हणून लढत आहेत.पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसकडून विश्वजित कदम आणि भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांच्यातील टक्कर अपेक्षित होती, मात्र ही जागाही शिवसेनेकडे गेली आणि हा सामना टळला. देशमुख रिंगणाबाहेर राहिले.तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्टÑवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्याविरोधात शिवसेनेने भाजपमधूनच आयात केलेल्या अजितराव घोरपडेंना उभे केले. या तीन जागा भाजपने का सोडल्या? तयारी केलेल्या शागिर्दांची खडाखडी सुरू असताना ‘वर’चे वस्ताद नुरा कुस्ती करत आहेत का, हा सवाल उपस्थित होत आहे. मिरजेत भाजपचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्याविरोधात काँग्रेस आघाडीला उमेदवाराची शोधाशोध करावी लागली. सांगलीत भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासमोर काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांनी आव्हान उभे केले आहे.प्रचारातील प्रमुख मुद्दे१) रखडलेल्या सिंचन योजना आणि त्यांना मिळणारा निधी हा मुख्य मुद्दा असेल.२) महापुराच्या काळात पूरग्रस्त भागात मंत्री, भाजपचे खासदार-आमदार यांची अनुपस्थिती आणि प्रशासनाला आलेले अपयश यावरून विरोधक रान पेटवतील. ३) मोठ्या उद्योगांची कमतरता-रोजगार, खराब रस्ते हे मुद्देही प्रचारात असतील.रंगतदार लढतीखानापूर मतदारसंघात यंदाही ‘हाय व्होल्टेज’ सामना होत आहे. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील लढत आहेत, पण अपक्ष म्हणून! येथे काँग्रेस आघाडीने उमेदवार दिलेला नाही. बाबर यांच्या सर्व विरोधकांची ताकद पाटील यांच्यामागे आहे.जतमध्ये भाजपचे आमदार विलासराव जगताप यांना विश्वजित कदम यांचे मावसभाऊ विक्रम सावंत यांनी काँग्रेसकडून आव्हान दिले आहे, तर भाजपमधील नाराज गट, राष्टÑवादी, जनसुराज्य शक्ती आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन भाजपचे बंडखोर डॉ. रवींद्र आरळी यांना उतरवले आहे.शिराळ्यामध्ये भाजपकडून आमदार शिवाजीराव नाईक आणि राष्टÑवादीकडून मानसिंगराव नाईक हे प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. भाजपशी संलग्न असलेल्या विकास आघाडीतील सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केल्याने चुरशीची तिरंगी लढत पहायला मिळत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस