शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : शागिर्दांच्या खडाखडीत वस्तादांची नुरा कुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 04:30 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणून इस्लामपूरमध्ये एकास एक उमेदवार देण्याचे प्रयत्न फसले.

- श्रीनिवास नागेसांगली जिल्ह्यातील आठपैकी तीन जागांवर तिरंगी, तर पाच ठिकाणी दुरंगी सामना रंगणार आहे. तीन जागांवर वर्षभर तयारी केलेले तगडे उमेदवार असतानाही भाजपने त्या जागा शिवसेनेला का सोडल्या आणि स्वत:कडे ताकदीचे उमेदवार नसतानाही शिवसेनेने त्या जागा का घेतल्या, या प्रश्नाने मात्र जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणून इस्लामपूरमध्ये एकास एक उमेदवार देण्याचे प्रयत्न फसले. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे हेवेदावे उफाळून आले. खोत यांचे नाव मागे पडले, पण त्यांनी गौरव नायकवडी यांचे नाव पुढे केले. त्यातच ही जागा शिवसेनेकडे गेली. सेनेने भाजपचे इच्छुक नायकवडी यांनाच तिकीट दिले. आता निशिकांत पाटीलही अपक्ष म्हणून लढत आहेत.पलूस-कडेगावमध्ये काँग्रेसकडून विश्वजित कदम आणि भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांच्यातील टक्कर अपेक्षित होती, मात्र ही जागाही शिवसेनेकडे गेली आणि हा सामना टळला. देशमुख रिंगणाबाहेर राहिले.तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्टÑवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्याविरोधात शिवसेनेने भाजपमधूनच आयात केलेल्या अजितराव घोरपडेंना उभे केले. या तीन जागा भाजपने का सोडल्या? तयारी केलेल्या शागिर्दांची खडाखडी सुरू असताना ‘वर’चे वस्ताद नुरा कुस्ती करत आहेत का, हा सवाल उपस्थित होत आहे. मिरजेत भाजपचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्याविरोधात काँग्रेस आघाडीला उमेदवाराची शोधाशोध करावी लागली. सांगलीत भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासमोर काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांनी आव्हान उभे केले आहे.प्रचारातील प्रमुख मुद्दे१) रखडलेल्या सिंचन योजना आणि त्यांना मिळणारा निधी हा मुख्य मुद्दा असेल.२) महापुराच्या काळात पूरग्रस्त भागात मंत्री, भाजपचे खासदार-आमदार यांची अनुपस्थिती आणि प्रशासनाला आलेले अपयश यावरून विरोधक रान पेटवतील. ३) मोठ्या उद्योगांची कमतरता-रोजगार, खराब रस्ते हे मुद्देही प्रचारात असतील.रंगतदार लढतीखानापूर मतदारसंघात यंदाही ‘हाय व्होल्टेज’ सामना होत आहे. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्याविरोधात काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील लढत आहेत, पण अपक्ष म्हणून! येथे काँग्रेस आघाडीने उमेदवार दिलेला नाही. बाबर यांच्या सर्व विरोधकांची ताकद पाटील यांच्यामागे आहे.जतमध्ये भाजपचे आमदार विलासराव जगताप यांना विश्वजित कदम यांचे मावसभाऊ विक्रम सावंत यांनी काँग्रेसकडून आव्हान दिले आहे, तर भाजपमधील नाराज गट, राष्टÑवादी, जनसुराज्य शक्ती आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन भाजपचे बंडखोर डॉ. रवींद्र आरळी यांना उतरवले आहे.शिराळ्यामध्ये भाजपकडून आमदार शिवाजीराव नाईक आणि राष्टÑवादीकडून मानसिंगराव नाईक हे प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. भाजपशी संलग्न असलेल्या विकास आघाडीतील सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केल्याने चुरशीची तिरंगी लढत पहायला मिळत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस