शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 05:42 IST

Kabaddi News:नियोजनबद्ध आणि सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना भारतीय महिला संघाने अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सोमवारी चायनीज तैपईला ३५-२८ असे नमवले आणि दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक पटकावला. महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेचे हे दुसरे सत्र होते आणि दोन्ही वेळी भारतानेच विश्वचषकावर मोहोर उमटवली.

ढाका - नियोजनबद्ध आणि सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना भारतीय महिला संघाने अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सोमवारी चायनीज तैपईला ३५-२८ असे नमवले आणि दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक पटकावला. महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेचे हे दुसरे सत्र होते आणि दोन्ही वेळी भारतानेच विश्वचषकावर मोहोर उमटवली.

अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच भारताने आक्रमक खेळ केला. मध्यंतराला २०-१६ अशी आघाडी घेत वर्चस्व राखल्यानंतर भारताने दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळ करत चायनीज तैपईला पुनरागमनाची संधी दिली नाही. चढाई आणि पकडीमध्ये शानदार कौशल्य दाखवत भारतीयांनी चायनीज तैपईचे मानसिक खच्चीकरण केले. संजू देवी आणि उपकर्णधार पुष्पा यांच्या आक्रमक चढाया भारतासाठी निर्णायक ठरल्या. एकवेळ चायनीज तैपईने लोण चुकवताना १२-९ अशी आघाडी मिळवली. परंतु, संजूच्या एका दमदार चढाईच्या जोरावर भारताने बरोबरी साधली आणि यानंतर मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखली. 

१३ वर्षांनी आयोजनमहिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन तब्बल १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर करण्यात आले. याआधी, पाटणा येथे २०१२ साली पहिली महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धा रंगली होती. त्यावेळी भारताने अंतिम सामन्यात इराणला २५-१९ असे नमवून पहिले विश्वविजेतेपद पटकावले होते. पुरुष कबड्डी विश्वचषक स्पर्धा २००४, २००७ आणि २०१६ अशी तीनवेळा आयोजित झाली असून, तिन्ही वेळा भारतानेच बाजी मारताना अंतिम सामन्यात इराणला पराभूत केले. अ गटात अव्वल स्थान पटकावत भारतीय महिलांनी बांगलादेश, थायलंड, युगांडा आणि जर्मनी यांना नमवले. यानंतर उपांत्य फेरीत इराणचे तगडे आव्हान ३३-२१ असे परतवून लावत दिमाखात अंतिम फेरी गाठली होती. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : India Women's Kabaddi Team Clinches World Cup, Defeats Chinese Taipei

Web Summary : India's women's kabaddi team secured their second World Cup title, defeating Chinese Taipei 35-28 in a thrilling final. Sanju Devi and Pushpa's raiding skills proved crucial. India dominated after an initial Taipei lead, maintaining control to win the coveted championship after 13 years.
टॅग्स :Kabaddiकबड्डीIndiaभारत