शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: वाकुर्डे पाणी उपसा योजनेच्या गळतीने ५०० एकर क्षेत्राला धोका; आवर्तनावरून 'या' दोन तालुक्यात संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 18:35 IST

पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा विरोध

शिराळा : वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या सिंचन आवर्तनावरून सध्या शिराळा व वाळवा तालुक्यात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे दुष्काळी पट्ट्यातील गावे पाण्यासाठी मागणी करत असताना, दुसरीकडे कालवा गळतीमुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. यामुळे जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून पेचात पडले आहेत.

वाकुर्डे बुद्रुक करमजाई तलाव ते मानकरवाडी या दरम्यान असलेल्या ३ किलोमीटरच्या कालव्याला मोठी गळती आहे. शासकीय सर्वेक्षणानुसार, या गळतीमुळे परिसरातील सुमारे ५०० एकर शेती नापीक होण्याची भीती आहे. सध्या शेतात ऊस, पावटा, मका यांसारखी पिके उभी आहेत. पाणी सोडल्यास ही पिके कुजून मोठे नुकसान होईल, असा पवित्रा स्थानिक शेतकऱ्यांनी घेतला आहे.

‘‘जोपर्यंत गळती प्रतिबंधक काम सुरू होत नाही, तोपर्यंत पाणी सोडू देणार नाही’’, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. शिराळा व वाळवा तालुक्यातील निगडी, पाडळी, आवंढी, खेड, रेड, बेलदारवाडी, कापरी, कार्वे, ढगेवाडी, ऐतवडे बुद्रुक, रेठरे धरण, ओझर्डे, सुरूल, मरळनाथपूर, धुमाळवाडी, वाघवाडी, शिवपुरी आदी गावांना पाण्याची तीव्र गरज असून त्यांनी आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. 

मात्र, वाकुर्डे येथील गळतीबाधित शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे आवर्तन लांबणीवर पडले आहे. सध्या करमजाई तलाव पूर्ण भरला असून योजनेचे पंप सुरू आहेत. मात्र, मुख्य कालव्यातून पाणी सोडता येत नसल्याने तलावातील पाणी सांडव्यावरून शिराळा येथील मोरणा प्रकल्पात वळवण्यात येत आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी तीन दिवसांपासून शेतकऱ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तो अद्याप यशस्वी झालेला नाही.

करमजाई तलाव ते मानकरवाडी दरम्यानच्या ३ किमी कालव्याच्या गळतीमुळे ५०० एकर जमिनीवर संकट ओढवले आहे. पाणी सोडल्यास ऊस, पावटा आणि मका ही पिके तर वाया जातीलच, पण आगामी पावसाळ्यामुळे ही जमीन वर्षभर पडून राहण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर मोठा घाला पडणार आहे. - निवृत्ती शेटके, शेतकरी, वाकुर्डे बुद्रुक
 

या योजनेचे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र कालव्याच्या गळतीमुळे करमजाई तलाव ते मानकरवाडी येथील पिकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे पाणी सोडण्यास विरोध होत आहे. जलसंपदा विभागाचे कर्मचारी व अधिकारी गेले तीन दिवस शेतकऱ्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक शेतकरी गळती प्रतिबंधक काम सुरू झाल्याशिवाय पाणी सोडू देणार नाही, या मागणीवर ठाम आहेत. - एन. टी. पोतदार, कार्यकारी अभियंता.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Irrigation Leak Threatens Farms; Water Dispute Erupts.

Web Summary : Leakage in the Vakurde irrigation project threatens 500 acres. Shirala and Walwa farmers clash over water allocation amid demands and crop damage fears. Officials are trying to resolve the deadlock.