शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षणाचा सुरू आहे खेळखंडोबा; शाळा सुरू, महाविद्यालयांबाबत मात्र चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST

सांगली : कोरोनाचा प्रभाव कमी होताच मंदिरे, दुकाने, खेळ, आदींना सरकारने परवानगी दिली. मग महाविद्यालयांनीच काय घोडे मारले आहे? ...

सांगली : कोरोनाचा प्रभाव कमी होताच मंदिरे, दुकाने, खेळ, आदींना सरकारने परवानगी दिली. मग महाविद्यालयांनीच काय घोडे मारले आहे? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. दहा महिन्यांपासून महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होत आहे, त्याला सरकारच जबबादार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी आणि आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. जलतरण तलाव, मंदिरे, चित्रपटगृहे, मॉल, आदींना परवानगी मिळाली, महाविद्यालये मात्र अजूनही बंदच आहेत. ती सुरू करण्याविषयी शासकीय स्तरावर ठोस निर्णय होत नसून शिक्षण विभागही खेळखंडोबा करीत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

दहा महिन्यांपासून विद्यार्थी मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसले आहेत. अभियांत्रिकीचे विद्यार्थी तर सकाळी सातपासून संध्याकाळी सहापर्यंत मोबाईलमध्येच अडकून पडलेत. अभ्यासाचे होणारे नुकसान क्लासेसमधून भरून काढण्याची विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे. सरकारच्या धरसोडीच्या वृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ सुरू असल्याच्या प्रतिक्रिया आहेत.

चौकट

महाविद्यालये बंद, तरीही कॅम्पसमध्ये वर्दळ

सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांचे डोळे महाविद्यालये सुुरू होण्याकडे लागून राहिले आहेत. महाविद्यालये सुरू नसली तरी प्रशासकीय कामे, प्राध्यापकांचे मार्गदर्शन यासाठी कॅम्पसमध्ये गर्दी वाढत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालये बंदचा मोठा शैक्षणिक फटका बसला आहे. अभियांत्रिकी, आयटीआय, कायदा, वैद्यकीय, आदी शाखांच्या विद्यार्थ्यांची कसरत सुरू आहे.

पॉईंटर्स

एकूण महाविद्यालये - २१६

एकूण विद्यार्थी संख्या - ११५०००

कोट

सरकारने मद्यालये, मंदिरे, हॉटेल्स, व्यायामशाळांना परवानगी दिली. मग महाविद्यालयेच बंद का, असा आमचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी सरकार घेणार आहे काय, हेदेखील स्पष्ट झाले पाहिजे. पाचवी ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू झाले; त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयांचा निर्णय सरकारने त्वरित घ्यायला हवा.

- प्रतीक पाटील, अभाविप

कोट

महाविद्यालये बंद असल्याने होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला सरकारच जबाबदार आहे. महाविद्यालेय त्वरित सुरू झाली नाहीत तर आम्हाला आक्रमक व्हावे लागेल. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शैक्षणिक सत्र तातडीने सुरू केले पाहिजे.

- माधुरी लड्डा, अभाविप

कोट

कोरोनाविषयक खबरदारी घेऊन महाविद्यालये सुरू व्हायला हवीत. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्व महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांनीही आरोग्याची काळजी घेत महाविद्यालयात उपस्थिती लावायला हवी.

- सौरभ पाटील, एनएसयूआय

कोट

ऑनलाईन शिक्षणामुळे गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे महाविद्यालये सुुरू व्हायला हवीत. खासगी क्लासेसना परवानगी देताना सरकारने महाविद्यालयांचाही विचार करायला हवा होता. कोरोना बहुतांश संपुष्टात आल्याने महाविद्यालयांचे दरवाजे उघडायला हवेत.

- श्रेयस मोहिते, विद्यार्थी

-------------