शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादी खिळखिळी

By admin | Updated: August 14, 2015 00:01 IST

बाजार समिती निवडणूक : संजयकाका पाटील गटाशी युती; तासगावातील गदारोळाचा फटका--कवठेमहांकाळचे कुरुक्षेत्र

अर्जुन कर्पे -कवठेमहांकाळ  बाजार समितीच्या निवडणुकीतील पराभवाने दुष्काळी पट्ट्यातील राष्ट्रवादी पुरती खिळखिळी झाली असून, आर. आर. पाटील (आबा) यांनी बांधलेली राष्ट्रवादी पक्षाची मोट पक्षातीलच प्रमुख नेत्यांनी व पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांनी मोडण्याचा प्रयत्न केला आहे. आ. जयंत पाटील यांचे दुर्लक्ष, विजय सगरे, सुरेशभाऊ पाटील यांचा बेजबाबदारपणा आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील गटाशी केलेली युती व तासगावातील ‘दंगा’ बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभवास कारणीभूत ठरला आहे. हा पराभव गांभीर्याने न घेतल्यास व आत्मचिंतन न केल्यास, तालुक्यातून राष्ट्रवादी पक्ष हद्दपार होणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.सांगली बाजार समितीची निवडणूक ही खऱ्याअर्थाने भविष्यातील जिल्ह्याचे राजकारण बदलणारी ठरली आहे. परंतु याची बीजे दुष्काळी पट्ट्यातील मिरज, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यात पेरली गेली आहेत.बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आणि तालुक्यात राष्ट्रवादीला फंदफितुरीने, नाराजीने, उमेदवारी निश्चितीच्या प्रश्नांनी चक्रव्यूहात अडकविले. राष्ट्रवादीचे राज्यस्तरावरचे नेते जयंत पाटील हा चक्रव्यूह भेदतील व यशस्वी खेळी करतील, असे सर्वांनाच वाटत होते. परंतु या दुष्काळी पट्ट्यात ‘रेडिमेड’ कार्यकर्त्यांनी व प्रमुख नेत्यांनी जयंत पाटील यांच्यापर्यंत राजकीय वस्तुस्थिती कथन करून उपाययोजना करण्यापेक्षा, अति आत्मविश्वासाने आपलेच पॅनेल विजयी होणार, असे छातीठोकपणे सांगितले होते. साहजिकच नेहमी गांभीर्याने राजकारण करणाऱ्या जयंत पाटील यांनी या निवडणुकीत ढिले धोरण स्वीकारले. येथेच राष्ट्रवादीचा घात झाला व त्यांना पराभवास सामोरे जावे लागले.जयंत पाटील यांच्यानंतर तालुक्यात निवडणुकीची जबाबदारी होती, ती राष्ट्रवादीचे नेते विजय सगरे, सुरेशभाऊ पाटील व चंद्रकांत हाक्के यांच्यावर. या त्रिमूर्तीने मोठ्या जोशात निवडणूक हाती घेणे गरजेचे होते. परंतु संपूर्ण निवडणुकीच्या काळात व निवडणुकीपूर्वीही या नेत्यांमधील बेजबाबदारपणा व दुर्लक्ष स्पष्ट जाणवत होते. बाजार समितीच्या उमेदवारी निश्चितीवरुन राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य घडले. परंतु त्याबाबत तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी गांभीर्याने घेतले नाही. पॅनेलप्रमुख जयंत पाटील यांच्यापर्यंत नाराजीनाट्य नेऊन ते थांबविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले नाहीत. याचाही फटका राष्ट्रवादीला बसला. परंतु जयंत पाटील यांच्यानंतर विजय सगरे, सुरेश पाटील या प्रमुख नेत्यांनी नाराजांशी चर्चा करून कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन लढाईत उतरणे आवश्यक होते. परंतु हे दोन्ही नेते उच्च पातळीवरील व आदेशाचे राजकारण करीत राहिले. या वेळेत अजितराव घोरपडेंच्या तात्यासाहेब नलवडे, तानाजी पाटील या सरदारांनी राजवर्धन घोरपडेंना सोबत घेऊन राष्ट्रवादीचे पॉकेट असणाऱ्या गावांतून फोडाफोडी केली व बेरजेचे राजकारण केले. हे राष्ट्रवादीच्या लक्षात यायला पराभवाचा दिवस उजाडायला लागला. त्यावेळी राष्ट्रवादीकडे पश्चातापाशिवाय काहीच उरले नव्हते.विजय सगरे यांनी महांकाली कारखान्याच्या निवडणुकीसारखी मशागत या निवडणुकीत केली असती, सुरेश पाटील यांनीही विधानसभेसारखी फिल्डिंग लावली असती आणि जयंत पाटील यांनी या मशागतीची उजळणी केली असती, तर राष्ट्रवादीला पराभवाचा फटका बसला नसता.काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळआबा-काका गटात झालेला गदारोळ तालुक्यात चांगलाच महागात पडला. दुखावलेल्या निष्ठावान आबाप्रेमींनी जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील यांच्या युतीला रेड सिग्नल देत विरोधात कौल दिला. त्याचा मोठा फटका पक्षाला सहन करावा लागला. ही निवडणूक राष्ट्रवादीला चांगलाच धडा शिकविणारी, तर अजितराव घोरपडे गटाला उर्जितावस्था आणि काँग्रेसला बळ देणारी ठरली. जयंत पाटील यांच्यासारख्या कुशल व राजकारणात पारंगत असणाऱ्या नेत्याला हार पत्करावी लागली. वरिष्ठ नेतृत्वापासून तालुकास्तरापर्यंतच्या नेत्यांनी ही निवडणूक गांभीर्याने न घेतल्याने, तसेच अतिआत्मविश्वासाने, जबाबदारी झटकल्याने निवडणूक हातातून घालविली. याचा मोठा फटका कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादीला बसला असून पक्ष खिळखिळा झाला आहे. या पराभवानंतरही नेत्यांनी गांभीर्याने घेतले नाही, तर तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष औषधाला तरी उरणार का?, असा सवाल तालुक्यातील राष्ट्रवादीप्रेमी करू लागले आहेत.हाक्केंच्या ‘शिवराळ गप्पा’ महागात पडल्याढालगावच्या चंद्रकांत हाक्के यांनी जयंत पाटील यांच्या मनधरणी व आदेशानंतर फिल्डिंग लावली व प्रयत्नही केले. परंतु हाक्के यांच्या चारचौघांच्या बैठकीतील ‘शिवराळ गप्पा’ चांगल्याच महागात पडल्या. या गप्पांमुळे थेट मतदारांच्या मनावर जखमा झाल्या व हे जखमी कार्यकर्ते ‘ओठात एक व पोटात एक’ या उक्तीप्रमाणे वागले.