शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

स्मृतिदिनानिमित्त वाळव्यात नागनाथअण्णांच्या विचारांचा जागर

By admin | Updated: March 19, 2015 00:01 IST

वैभव नायकवडी : आजच्या युवकांनी अण्णांचे ऐतिहासिक कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवावे

वाळवा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णांचा स्मृतिदिन हा त्यांच्या विचारांचा जागर व तत्त्वांची जपणूक करण्यासाठी आपण साजरा करतो. कार्यक्रमास युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, कारण या निमित्ताने अण्णांचे अभूतपूर्व व ऐतिहासिक कार्य त्यांच्यासमोर येईल, व त्यांच्या माध्यमातून ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी केले.नागनाथअण्णा स्मृतिदिन सोहळ्याच्या नियोजनासाठी हुतात्मा किसन अहिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्षेत्रातील १५ गावांतील कार्यकर्ते व स्मृतिदिन सोहळ्याच्या कमिट्यांच्या सदस्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पाटील, कारखान्याचे प्रभारी संचालक जी. एस. कुदळे, माजी अध्यक्ष महादेव कांबळे, बॅँकेचे कार्यकारी अधिकारी सुबराव पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नायकवडी म्हणाले की, अण्णांच्या स्मृतिदिनानिमित्ताने आपण एकत्र येतो, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हुतात्माच्या परंपरेप्रमाणे सोहळा नेटकाच होईल. साधारणपणे ५० हजारांहून अधिक लोक कार्यक्रमास उपस्थित राहतील.
यावेळी प्रा. आनंदराव शिंदे, प्रा. मधुकर वायदंडे, प्रा. हाशिम वलांडकर, प्रा. बाळासाहेब नायकवडी, जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस. व्ही. कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. धरणग्रस्त नामदेव नांगरे म्हणाले की, अण्णांनी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी १६५ मोर्चे व ४७ वेळा धरणे आंदोलन केले. म्हणूनच आज आम्हाला न्याय मिळाला.
अण्णांच्या स्मृतिदिनासाठी २० हजार निमंत्रण पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी मंडप उभारणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. व्यासपीठ, मंडपस्थळी प्रवेशद्वार व कमानी उभारण्याचे काम सुरु आहे. समाधीस्थळी मंडप उभारण्यात आला आहे. सकाळी आठ वाजल्यापासून दिवसभर उपस्थितांच्या भोजनाची व्यवस्था कारखाना कार्यस्थळी करण्यात आली आहे. मंडपस्थळी स्फूर्तिगीत, भावगीत व क्रांतिगीते सादर केली जाणार आहेत.
२२ मार्चला सकाळी सात वाजता हुतात्मा किसन अहिर, जिजामाता विद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची प्रभातफेरी सर्व गावातील मुख्य मार्गावरुन काढण्यात येणार आहे. २0 कमिटीच्या सदस्यांनी आपली कामे पूर्णत्वाकडे नेली आहेत.
यावेळी सरपंच गौरव नायकवडी, दूध संघाचे उपाध्यक्ष जयवंत अहिर, प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, मुख्याध्यापक एस. पी. होरे, सुबराव गावडे, मुख्याध्यापिका एस. व्ही. कांबळे, बाळासाहेब पाटील, मोहन सव्वासे, शिवाजी सापकर, बबन हवालदार, विठ्ठल चौगुले, अशोक माने, भगवान अडिसरे, बी. टी. घारे, गंगाराम सूर्यवंशी, आनंदा सूर्यवंशी यांच्यासह संकुलातील सर्व कार्यकर्ते, कामगार, सभासद उपस्थित होते. (वार्ताहर)