शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात तरुणाई रंगपंचमीत बेधुंद...

By admin | Updated: March 12, 2015 00:06 IST

पदाधिकारीही रंगात दंग : दिवसभर डॉल्बीचा ताल, दुचाकींची चाल आणि रंगांची उधळण करीत धमाल

इस्लामपूर : अवकाळी पावसाच्या दणक्याने तापलेले वातावरण आणि आग ओकणारा सूर्य डोक्यावर घेत शहर व परिसरातील तरुणाईने रंगांची उधळण करीत आज बेधुंदपणे रंगपंचमीचा आनंद लुटला. रंगपंचमीच्या या आनंदाला बऱ्याच ठिकाणी डीजे च्या दणदणाटाची साथ लाभली, तर कोंडूस्करच्या गोळ्याही बऱ्याचजणांनी रिचविल्याने त्यांचा बेभान ताल काही औरच होता.
शहरात आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या पारंपरिक रंगपंचमीला उधाण आले होते. लहान चिमुरड्यांनी तोंडाला रंग फासून पाण्याचा मारा करीत या उत्सवाला सुरुवात केली. त्यानंतर सूर्याचा पारा जसा चढला, तसे रंगवलेल्या चेहऱ्यांसह तरुणाई मोटारसायकलवरुन रंग उधळत रस्त्यावरुन फिरु लागली. रासायनिक रंगांचा फाटा देत नैसर्गिक रंगांचा आणि पाण्याचा वापर, हे या रंगपंचमीचे वैशिष्ट्य ठरले.
चौका—चौकात आणि गल्लोगल्लीच्या अरुंद रस्त्यांवरही रंगपंचमीची धमाल सुरु होती. शिवाजी चौक, गांधी चौक, जयहिंद चित्रमंदिर परिसर, आष्टा नाका, अहिल्यादेवी चौक, शिराळा नाका, गणेश मंडई, होळकर डेअरी, महावीर चौक अशा प्रमुख ठिकाणी डॉल्बीच्या दणदणाटात रंगपंचमीला उधाण आले होते. पाण्याच्या काहिली आणि खासगी टँकरमधील पाण्याचे फवारे मारत तरुणाईने रंगपंचमी साजरी केली. दरम्यान, नगरपालिकेत प्रशासनासह पदाधिकारीही रंगात न्हाऊन निघाले. न्यायालयाशेजारीच पालिकेची इमारत असल्याने तेथे गलबला होताच न्यायालयातून सूचना केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांचा फौजफाटा येईपर्यंत इथली रंगपंचमी उरकण्यात आल्याने, तेथील शांतता पाहून पोलीस परतले. रंगमंचमीचे हे वातावरण सायंकाळी सहा वाजेपर्यंत होते. (वार्ताहर)


‘मुक्तांगण’मध्ये रंगपंचमीद्वारे जागृती
नैसर्गिक रंगाने रंगपंचमी खेळून मुक्तांगण प्ले स्कूलमधील चिमुकल्यांनी धमाल केली. वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन चेहरा आणि शरीर रंगवण्याची स्पर्धा झाली. पालकांनी मुलांचे चेहरे रंगवताना ‘मुलगी वाचवा, खेळातून शिक्षण, जय-जवान, वृक्षतोड थांबवा, वाघ वाचवा, हसत खेळत राहा, स्वच्छ भारत’ असे संदेश रेखाटले. साक्षर भारत, समृध्द भारत दर्शवताना राष्ट्रध्वजाची रंगसंगती केली. येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये चार वर्षाच्या आतील मुलांना विविध अनुभव दिले जातात. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पाणी वाचवा, रासायनिक रंगांचा वापर टाळा, असा संदेशही या स्पर्धेतून दिला गेला. तीसहून अधिक मुलांनी आणि पालकांनी सहभाग घेतला. मुलांनी उत्साही वातावरणात स्वत:चे चेहरे रंगवून घेतले. झेंडू, पळस, बीट, हळदीपासून कलर तयार करुन आणले होते. स्कूलच्या संचालिका वर्षाराणी मोहिते, पूनम साटम, सायली शिंगे, मनीषा मोरे यांनी संयोजन केले.