शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: ..त्यापेक्षा नाकर्त्या राज्यकर्त्यांना हाकला, रघुनाथदादा पाटलांचे टीकास्त्र

By अशोक डोंबाळे | Updated: December 3, 2022 18:59 IST

जनतेची लूट करून घरे भरण्याचा उद्योग सुरू आहे. याला कोणताच पक्ष अपवाद दिसत नाही.

सांगली : कर्नाटक, तेलंगणा, गुजरात सीमावर्ती भागातील महाराष्ट्रातीलशेतकरी, पिचलेली जनता शेजारच्या राज्यातील सोई-सुविधा, प्रगती पाहून तिकडे जाण्याची भाषा करत आहे. त्याला इथले आजपर्यंतचे राज्यकर्ते कारणीभूत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी राज्य सोडून जाण्यापेक्षा नाकर्त्या राज्यकर्त्यांना हाकला, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत आज, शनिवारी केली.रघुनाथदादा पाटील म्हणाले, जत पूर्वी भागातील जवळपास ४२ गावे कर्नाटकात जाण्यास तयार आहेत. नांदेड जिल्ह्यातील बिलोली ता. तेलंगणा राज्यात सामील करण्याची मागणी आहे. गुजरात शेजारील महाराष्ट्रातील गावेही तिकडे जाण्याची भाषा करत आहेत. हे सर्व का घडतंय?आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांचा भ्रष्ट आणि अकार्यक्षम कारभार कारणीभूत आहे. खोके आणि फ्रीजच्या खोक्यातून पैशाची भाषा सुरू आहे. जनतेची लूट करून घरे भरण्याचा उद्योग सुरू आहे. याला कोणताच पक्ष अपवाद दिसत नाही. त्यामुळे इथली जनता वैतागली आहे. हे महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांसाठी निश्चितच भूषणावह नाही. राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे उदाहरण आहे. कर्नाटक, तेलंगणामध्ये १०० टक्के मोफत वीज आणि पाणी मिळत आहे. रस्ते चांगले असून शेतीमालाला दरही चांगला मिळत आहे. गुजरातचे अमूल दूध सर्वाधिक दर देत असून उसाला गुजरातमध्ये प्रति टन ४७०० रुपये, उत्तर प्रदेशात ३९०० रुपये, कर्नाटकात ३६०० रुपये आणि महाराष्ट्रातील साखर कारखाने ३०५० रुपये दर देत आहेत. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचे धोरण शेतकरीविरोधी असल्यामुळेच शेतकरी, कष्टकऱ्यांना महाराष्ट्रात राहावे असे वाटत नाही, ही गंभीर बाब आहे. यातून तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडा घेऊन शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, असेही त्यांनी आवाहन केले.

राज्यकर्त्यांनीच शासकीय दूध डेअरी बंद पाडलीमहाराष्ट्रातील दूध संघ चालकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी शासकीय दूध डेअरी बंद पाडण्याचे पाप केले आहे. एकही शासकीय संस्था राज्यकर्त्यांनी चांगली चालविली नसल्यामुळेच महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. गुजरातचे अमूल दूध देशात नंबर एकवर गेले असताना महाराष्ट्रातील शासकीय डेअरीला कुलूप कसे लागते ? असा संतप्त सवालही रघुनाथदादांनी उपस्थित केला. सहकारी साखर कारखानेही बंद पाडून खासगी कंपन्यांच्या घशात घातले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

दूध संघाकडून आठ हजार कोटींचा गैरव्यवहारदूध उत्पादकांना प्रति लिटर २५ रुपये दूध दर देण्यासाठी राज्य सरकारने प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान दूध संघ चालकांना दिले होते. दि. १९ जून २०१७ ते दि. २७ सप्टेंबर २०१८ या कालावधीत शेतकऱ्यांच्या दुधातील रकमेत आठ हजार कोटींचा दूध संघ चालकांनी गैरव्यवहार केला आहे, असा आरोप रघुनाथदादांनी केला. या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी तत्कालीन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, सुनील केदार आणि सध्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे. या एकाही मंत्र्याने चौकशी करून दोषींवर कारवाई केली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकFarmerशेतकरी