शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
3
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
4
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
5
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
6
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
7
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
8
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
9
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
10
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
11
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
12
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
13
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
14
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
15
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
16
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
17
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
18
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
19
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
20
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील उद्योजकांचा उद्या बंद

By admin | Updated: February 26, 2015 00:08 IST

औद्योगिक संघटनांचा निर्णय : वीज दरवाढीचा निषेध; अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा

कुपवाड : महावितरण कंपनीने इतर राज्यांच्या तुलनेत केलेल्या दुप्पट दरवाढीच्या निषेधार्थ शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय आज मिरजेत झालेल्या औद्योगिक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला़ त्याचदिवशी सकाळी ११ वाजता विश्रामबाग चौकातून अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून, वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे.महावितरण कंपनीकडून राज्यातील उद्योजकांवर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक दरवाढ केली होती. त्यावेळी उद्योजकांनी लोकप्रतिनिधींची भेट घेऊन या होऊ घातलेल्या दरवाढीचा निषेध नोंदविला होता. तसेच याविरोधात आंदोलनाचा इशाराही दिला होता. तरीही या निषेधाची दखल शासनाने घेतली नाही. त्यांनी ३१ टक्के दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. ही वीज दरवाढ प्रचंड असून, इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट आहे. या दरवाढीच्या विरोधात राज्यातील उद्योजकांनी ३ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी बैठक घेऊन तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला.
त्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार जिल्ह्यातील उद्योजकांनीही आज मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या कार्यालयात बैठक घेतली. त्या बैठकीतही महावितरणने केलेल्या दुप्पट दरवाढीचा निषेध नोंदविला. तसेच शुक्रवारी सांगली व परिसरातील सर्व उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचदिवशी सकाळी विश्रामबाग चौकातून महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा काढण्याबरोबरच वीज बिलांची होळीही करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानंतरही शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा उद्योजकांकडून देण्यात आला आहे. बैठकीमध्ये सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, उमेद उद्योग समूहाचे प्रमुख सतीश मालू, कृष्णा व्हॅली चेंबरचे उपाध्यक्ष रमेश आरवाडे, सेक्रेटरी पांडुरंग रूपनर, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील, हेमंत महाबळ, दीपक शिंदे, के. एस. भंडारे, सतीश वाघ, शंकरराव तायशेट्टी, हर्षल खरे, दीपक मर्दा, विजय भोसले, अरविंद जोशी, अशोक भोसले, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीचे योगेश जोशी, डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या प्रभाताई कुलकर्णी, गणेश निकम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)


भ्रष्टाचार लपविण्यासाठी दरवाढ
वीजगळती, अकार्यक्षम कारभार व भ्रष्टाचार लपविण्यासाठी ही दरवाढ केली आहे. इतर राज्यात कार्यक्षम कारभार सुरू असल्यामुळे तेथे कमी दराने वीज मिळते. महाराष्ट्रात का दर कमी होत नाहीत. यांची अकार्यक्षमता ग्राहकांच्या माथी मारली जात आहे. या दरवाढीमुळे उद्योजकांचे कंबरडेच मोडणार आहे, असे मत सांगली-मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके यांनी व्यक्त केले.