शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाजपने देशाला कर्जाच्या खाईत ढकलले, जयंत पाटीलांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 15:30 IST

'शेतकऱ्यांना कर्जमाफी, उद्योग, रोजगार हे काहीही न करता मूठभर श्रीमंतांची २५ लाख कोटींची कर्जे माफ करण्याचे काम त्यांनी केले'

बोरगाव : मोदी सत्तेवर येण्यापूर्वी देशावर ५६ लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. १० वर्षांत ते २१० लाख कोटी रुपयांवर गेले. शेतकऱ्यांना कर्जमाफी, उद्योग, रोजगार हे काहीही न करता मूठभर श्रीमंतांची २५ लाख कोटींची कर्जे माफ करण्याचे काम त्यांनी केले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.बोरगाव (ता. वाळवा) येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी सत्यजित पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, प्रतीक पाटील आदी उपस्थित होते.जयंत पाटील म्हणाले, भाजप पुन्हा सत्तेत आल्यास देशावरील कर्जे कमी करण्यासाठी जीएसटीसारखे कर वाढविण्याचा धोका आहे. एक लाखाची खते घेतली, तर त्यातून १८ हजार रुपये जीएसटी भरावा लागतो. त्यातूनच शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. ही पाकीटमारी आहे.सत्यजित पाटील म्हणाले, भाजपने गेल्या १० वर्षांत अशी कोणती कामे केली, की ज्याच्या जोरावर ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून देण्याची भाषा भाजप करीत आहेत. पुन्हा सत्तेवर येण्याची खात्री नसल्यानेच सत्तेचा गैरवापर करून दुसऱ्यांचे पक्ष फोडत आहेत.उपसरपंच सचिन पाटील, तानाजी पाटील, शकील सय्यद, योजना पाटील, अभिजित पाटील, कार्तिक पाटील, धैर्यशील पाटील, उदय शिंदे, शिवाजी वाटेगावकर, संजय पाटील, देवराज देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Jayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाSatyajit Patilसत्यजित पाटील