शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीच्या आड याल, तर आडवे करू!

By admin | Updated: March 19, 2015 23:55 IST

महापौरांचा इशारा : दंड, व्याजासह एलबीटी वसुलीचे आदेश; व्यापाऱ्यांशी चर्चेस नकार

सांगली : महापालिकेच्या महासभेत एलबीटीच्या वसुलीवरून आज (गुरुवारी) वादळी चर्चा झाली. व्यापाऱ्यांना थकित कराच्या दंड व व्याजात सूट देण्यास सर्वपक्षीय सदस्यांनी विरोध केला. महापौर विवेक कांबळे यांनीही सवलतीचा प्रस्ताव फेटाळत दंड, व्याजासह ३१ मार्चपर्यंत एलबीटी वसूल करण्याचे आदेश आयुक्तांना दिले. कर वसुलीच्या आड येणाऱ्यास आडवे करू, अशा शब्दात महापौरांनी व्यापाऱ्यांना इशारा दिला. महासभेत नगरसेविका पद्मिनी जाधव यांनी एलबीटी वसुलीबाबत महापौरांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल अभिनंदनचा ठराव मांडला होता. या ठरावावरील चर्चेत काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीच्या सदस्यांनी व्यापाऱ्यांवर हल्लाबोल करीत कर वसुलीसाठी प्रशासनाच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांनी दंड, व्याजाव्यतिरिक्त व्यापाऱ्यांकडून ३१ मार्चपर्यंत एलबीटीची मुद्दल वसूल करावी, त्यासाठी व्यापाऱ्यांची बैठक घ्यावी, अशी भूमिका मांडली. पण त्याला महापौर कांबळे यांनी स्पष्ट शब्दात नकार देत, आता व्यापाऱ्यांशी चर्चा करण्याची गरज नसल्याचे ठणकावून सांगितले.
नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले की, एलबीटी रद्द झाल्यानंतर स्थानिक स्वराज संस्था कशा चालणार, यावर अर्थमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे महापालिकेने एक आॅगस्टपर्यंत जकात सुरू करावी.
त्याला अनुमोदन देत सुरेश आवटी म्हणाले की, पुढील पाच महिन्यांत कर वसुलीसाठी प्रशासनाने ठाम भूमिका घेतली पाहिजे. व्यापाऱ्यांनी आजअखेर सहानुभूती दाखविलेली नाही. कर वसुलीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाईट वागणूक दिली आहे. मग पालिकेने त्यांना सहानुभूती द्यायची गरज नाही. त्यांच्याकडून दंड, व्याजासह कर वसूल करावा. एक एप्रिलपासून जकात लागू करता येते का? याचाही विचार व्हावा.
गौतम पवार म्हणाले की, एलबीटीवरच पालिकेचा गाडा चालतो. त्यामुळे कराची वसुली झाली पाहिजे. राज्याच्या विधी विभागाने एलबीटी हटविल्यास स्थानिक स्वराज संस्थेची स्वायत्तता नष्ट होईल, असा अभिप्राय दिला आहे. त्यामुळे एलबीटीचा निर्णय भाजप शासनाने लांबणीवर टाकला आहे. आम्ही शिवसेनेशी संबंधित व्यापाऱ्यांना कर भरण्यासाठी आवाहन करणार आहोत.
शेखर माने यांनी जकात लागू करण्यास विरोध केला. केवळ ३० टक्के व्यापारी कर भरत नाहीत. त्यांच्याशी अधिकाऱ्यांचे लागेबांधे आहेत. जकात असतानाही हेच व्यापारी कर भरत नव्हते. या व्यापाऱ्यांची चुकवेगिरी मोडीत काढावी.
विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले की, व्यापाऱ्यांनी दीड वर्ष नागरिकांकडून एलबीटी वसूल केला आहे. त्यामुळे दंड, व्याज माफ न करता वसुली करावी. जकातीच्या पर्यायावरही महापौरांनी विचार करावा. (प्रतिनिधी)

जकात लागू करण्याची मागणी
सभागृहात जगन्नाथ ठोकळे यांनी, एक एप्रिलपासून पुन्हा जकात लागू करण्याची मागणी केली. त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानीच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. आयुक्त अजिज कारचे म्हणाले की, जकातीबाबत धोरणात्मक निर्णय घेताना पालिकेला विशेष सभा बोलावावी लागेल. ऐनवेळच्या विषयात हा ठराव करता येणार नाही. महापालिकेने जकात सुरू करण्याचा ठराव केला तरी, त्याला शासनाची मान्यता घ्यावी लागेल. त्याशिवाय त्याची अंमलबजावणी करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

व्यापाऱ्यांना दंड, व्याजात कोणतीही सवलत दिली जाणार नाही. व्यापाऱ्यांशी चर्चा करण्याची गरज नाही. प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत थकित एलबीटी वसूल करावा. त्यासाठी उद्या, शुक्रवारपासून सकाळी आठ ते सायंकाळी आठपर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी बाहेर पडावे. एलबीटी न भरलेल्या व्यापाऱ्यांचा माल शहरात आल्यास तो जप्त करावा. पालिकेची वसुली दीडशे ते पावणेदोनशे कोटीपर्यंत गेल्यास तितकेच अनुदान भविष्यात आपणाला मिळणार आहे. या कामात कोणी आड येत असेल तर त्याला आडवा करू.
- विवेक कांबळे, महापौर