शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आयर्विन पुलावरील अवजड वाहतुकीस बंदी येणार

By admin | Updated: August 5, 2016 01:58 IST

आज निर्णय शक्य : इतर चार पुलांचाही आढावा

सांगली : महाडजवळ ब्रिटिशकालीन पूल वाहून गेल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन व इतर जुन्या पुलांचा आढावा घेण्यासाठी आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक होत आहे. यापूर्वी प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार आयर्विन पुलावरील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. गुरुवारी मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मानिनी शंकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रशासनाला सूचना दिल्या. महाड येथील घटनेनंतर जिल्ह्यातील जुन्या पुलांच्या स्थितीबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जुन्या व रहदारी असलेल्या पुलांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी आज बैठक बोलावली आहे. या बैठकीला महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्यासह एसटी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने आयर्विन पुलावरील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्याबाबत चर्चा होऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे समजते. गुरुवारी मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मानिनी शंकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील पुलांचा आढावा घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी त्यांना माहिती दिली. आयर्विन पुलाबरोबरच सांगली-कोल्हापूर मार्गावरील अंकली येथील पूल, गुहागर-कडेगाव राज्यमार्गावरील नांदणी नदीवरील पूल, मिरज-म्हैसाळ मार्गावरील वड्डी येथील ओढ्यावरील पूल आणि गुहागर राज्यमार्गावरील येरळा नदीवरील पुलांची स्थिती व त्यावरील रहदारीचा आढावा त्यांनी घेतला. बांधकाम विभागाने जिल्ह्यातील जुन्या व विशेषत: ब्रिटिशकालीन असलेल्या पुलांची मान्सूनपूर्व पाहणी करून त्याचा अहवाल सादर केला आहे. त्यात कोणत्याही पुलास धोका नसल्याचे सांगितले असले, तरी खबरदारीचा उपाय म्हणून आज बैठकीत सर्व पुलांच्या स्थितीबाबत चर्चा होणार आहे. यापूर्वीच शासनाने दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी करत आयर्विन पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)निर्देशांचे पालन करणार आयर्विन पुलाबाबत सात वर्षांपूर्वीच सूचना आल्यानंतर तेथे फलक लावून सूचना देण्यात आली असली, तरी अजूनही या पुलावरून अवजड वाहतूक होते. या वाहतुकीला पर्यायाबाबत निर्णय घेताना शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले.