शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जालिहाळमध्ये ग्रामपंचायत बिनविरोधचा ‘सुवर्णमहोत्सव’

By admin | Updated: August 1, 2015 00:22 IST

परंपरा जपली : सलग दहावी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध; राजकारणापेक्षा विकासाला महत्त्व

संख : गावाचा विकास करण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून ५० वर्षांची परंपरा जपत ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून जत तालुक्यातील जालिहाळ खुर्दच्या ग्रामस्थांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. राजकारणासाठी राजकारण, तर विकासासाठी ऐक्य जपत सलग १० वी निवडणूक बिनविरोध झाली आहे. जालिहाळ खुर्द कर्नाटक सीमेलगत जतपासून पूर्वेकडे २८ कि.मी. अंतरावरील गाव. लोकसंख्या अवघी १०४१. द्राक्षे, डाळिंब, बागायतदारांचे सधन गाव, बेदाणा उत्पादनात आघाडीवर. ग्रामपंचायतीची स्थापना १० नोव्हेंबर १९६५ रोजी झाली. सुरुवातीपासून गावात एकी असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक होण्याची वेळच आली नाही. विरोध म्हणजे गावामध्ये भाजप, काँग्रेस पक्षाचे गट कार्यरत आहेत. ग्रामपंचायत, विकास सोसायटीची निवडणूक वगळता बाकीच्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीने भाग घेतला जातो. १९९० पर्यंत गावाचे नेतृत्व श्रीमंत पाटील, बाबूराव चव्हाण, रामजी पाटील, निवृत्ती सूर्यवंशी, आप्पा शिंदे, सिदगोंडा पाटील या जाणत्या नेत्यांकडे होते. त्यांच्या शब्दाला किंमत होती. त्यांच्या कालावधित गावाचा विकास झाला. गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून प्राथमिक मराठी शाळेची इमारत उभारली आहे. १९९० नंतर गावाचे नेतृत्व तरुण पिढीकडे आले. माजी सरपंच कामाण्णा पाटील, माजी अध्यक्ष राजू डफळे सरकार, केरुबा बिराजदार, कुंडलिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कारभार चालतो. ग्रामपंचायत निवडणूक, विकास सोसायटी निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रथम गावामध्ये दवंडी दिली जाते. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन चर्चा करतात. पंचांची निवड करतात. तरुण, सुशिक्षित, काम करण्याची आवड हे निकष ठेवून निवड केली जाते. लगेच त्याचवेळी सरपंच, उपसरपंचांची निवड केली जाते. कोणताही राजकीय गट यामध्ये राजकारण आणत नाही. तंटामुक्ती पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार, इको व्हिलेज, असे पुरस्कार गावाला मिळाले आहेत. (वार्ताहर)उमदी.. पोलीस हद्दीतील शांतताप्रिय गावउमदी हे पोलीस हद्दीतील शेवटचे गाव आहे. गावामध्ये पंचायत भरवून न्यायनिवाडा केला जातो. आतापर्यंत एकही वाद न्यायालयापर्यंत गेलेला नाही. गावातील खटला नोंदीचे रजिस्टर कोरेच आहे. निवडणुकीवेळी गावात पोलीस येतात. गावात एकच गणपती बसविला जातो.महिलांना संधीपुरुषांबरोबर महिलांनाही संधी देण्यात आली आहे. यापूर्वी उपसरपंच म्हणून गंगवा कोळी, तुळसाबाई करपे यांनी काम पाहिले आहे. पहिल्या महिला सरपंच म्हणून यल्लव्वा प्रल्हाद पाटील यांनी काम पाहिले आहे. यावेळी सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असून इतिहासात प्रथमच शांता दादा जावीर यांना संधी मिळणार आहे..लोकांमध्ये द्वेष, राजकीय वैमनस्य राहत नाही. विकासामध्ये राजकारण होत नाही. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत.- कामाण्णा पाटील, सरपंच५५ वर्षे निवडणूक बिनविरोध झाल्याने गावाचा सर्वांगीण विकास झाला आहे. नागरी सुविधांचे प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे. - राजू डफळे सरकार, उपसरपंच