शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योगाबाबत शासन उदासीन

By admin | Updated: September 13, 2015 22:51 IST

जयंत पाटील : शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीची सभा

इस्लामपूर : राज्यातील युती शासनाची वस्त्रोद्योगाला मदत करण्याची भूमिका नाही. वीज दरवाढीची बिकट समस्या निर्माण झाल्याने वस्त्रोद्योग अडचणीत आला आहे. रोजगार संधी उपलब्ध करून देण्याची मोठी क्षमता असणाऱ्या वस्त्रोद्योगाबाबत सरकारकडून लवकर निर्णय व्हावा, अशी अपेक्षा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केली.राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलातील शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणीची १३ वी वार्षिक सभा झाली. यावेळी आ. पाटील बोलत होते. बबन थोटे अध्यक्षस्थानी होते. संकुलाचे अध्यक्ष दिलीप पाटील, ज्येष्ठ नेते रामराव देशमुख, प्रा. शामराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आदर्श कामगार व त्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला. संचालक रघुनाथ मदने यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आ. पाटील यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.आमदार जयंत पाटील म्हणाले, बाजारात सध्या मंदी आहे. सूत, कापडाला उठाव नाही. वस्त्रोद्योगापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशावेळी शेतकरी-विणकरी सूतगिरणीने आपल्या यंत्रसामग्रीची कार्यक्षमता वाढवून या अडचणीच्या काळातही मार्गक्रमण करावे.संकुलाचे अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, विजेची दरवाढ, कापूस खरेदी-विक्री नियंत्रणाबाहेर गेली आणि बाजारात सुताला दर नाही, अशा अडचणीत सापडलेल्या सूतगिरण्यांबाबत शासनाने मदतीचे धोरण अवलंबले नाही, तर येत्या दोन महिन्यात राज्यातील सूतगिरण्या बंद पडण्याचा धोका आहे. शेतकरी विणकरी सूतगिरणीने अनेक संकटांवर मात करीत आपला लौकिक कायम ठेवला आहे. सूत उत्पादनासह मूल्यवर्धित प्रकल्पांची उभारणी केली आहे. शासनाने सूत निर्यातीस परवानगी देऊन प्रतिकिलो १० रुपये अनुदान द्यावे. वीजदरात कपात करावी. व्हॅट कराचा कोट्यवधींचा परतावा द्यावा, या मागण्यांसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत.सूतगिरणीचे अध्यक्ष बबन थोटे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. विजयकुमार घारगे, महादेव दानवरे यांना ‘आदर्श कामगार’ पुरस्काराने गौरविण्यात आले. वेदांतिका शिंदे, हिमांशू मोरे, सुमित चव्हाण, अथर्व शिंदे, श्रावणी पाटील, सुमित पाटील या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. संचालिका रोजा किणीकर यांनी आदरांजली ठराव मांडला. कार्यकारी संचालक हेमंत पांडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. मुख्य लेखापाल एच. बी. मुलाणी यांनी आर्थिक ताळेबंदाचे वाचन केले.इस्लामपूर शहर वाय-फाय केल्याबद्दल आ. जयंत पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी मांडला. मोहन आडके यांनी सूत्रसंचालन केले. संचालिका कमल पाटील यांनी आभार मानले.सभेला बशीर मोमीन, दिलीप वग्याणी, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, युवराज सूर्यवंशी, धनाजी पाटील, एम. एम. पाटील, अण्णा तगारे यांच्यासह सभासद, संचालक, अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थ आदी उपस्थित होते. (वार्ताहर)