शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

सरकारचे धोरण कामगार, शेतकरीविरोधी सांगली जिल्हा कृती समन्वय समितीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:15 IST

सांगली : शासकीय नोकरीमध्ये ३० टक्के कपात, शिक्षणातील खासगीकरण, कंत्राटी नोकरभरती, अंशदायी पेन्शन, शिक्षक बदल्या ही सरकारची धोरणे

ठळक मुद्देधोरणाविरोधात संघटित एल्गार; नऊ जानेवारीला राज्यातील नेत्यांची कऱ्हाड मध्ये बैठक

सांगली : शासकीय नोकरीमध्ये ३० टक्के कपात, शिक्षणातील खासगीकरण, कंत्राटी नोकरभरती, अंशदायी पेन्शन, शिक्षक बदल्या ही सरकारची धोरणे कर्मचाऱ्यांच्या विरोधातील आहेत. शेतकऱ्यांना ही भरभरून सरकार देत आहे, असाही भाग नाही. सरकारच्या या धोरणामुळे कर्मचारी, शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असा आरोप जिल्हा कृती समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी केला. सर्व संघटनांनी एकत्रित येऊन सरकारविरोधात एल्गार करण्यासाठी राज्यस्तरीय नेत्यांची दि. ९ जानेवारी २०१८ ला कºहाड येथे बैठक आयोजित केली आहे.

राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटना, जिल्हा परिषदेच्या सर्व संघटना, शिक्षक, आरोग्य कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांची सांगलीत शनिवारी बैठक झाली. या बैठकीस आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब पाटील, राज्य उपाध्यक्षा स्वप्नाली माने, जिल्हाध्यक्ष सुभाष मरीगुद्दी, अध्यक्ष एम. डी. जेऊर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष जे. के. महाडिक, सरचिटणीस पी. एन. काळे, कास्टाईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष धोंडिराम बेडगे, आरोग्य संघटनेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, परिचर संघटना अध्यक्ष सुभाष अर्जुने, जि. प. लेखा संघटना अध्यक्ष अशोक पाटील, कार्याध्यक्ष विजय डांगे,अल्पसंख्यांक कर्मचारी अध्यक्षा अध्यक्ष मुश्ताक पटेल, शिक्षक संघटना सरचिटणीस शशिकांत माणगावे, शिक्षक समितीचे सरचिटणीस बाबासाहेब लाड, मागासवर्गीय शिक्षक संघटना अध्यक्ष संतोष कदम, पदवीधर संघटना जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव भोसले आदी उपस्थित होते.

आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्यध्यक्ष अरुण खरमाटे म्हणाले की, राज्य सरकारचे कर्मचारी आणि शेतकरी हितापेक्षा त्यांना मानसिक त्रास देण्याचे धोरण आहे. शिक्षक बदल्या जिल्हास्तरावरुन एखाद्या कंपनीच्या भल्यासाठी राज्यस्तरावर नेल्या. नाहक शिक्षकांची फरफट चालू झाली आहे. कर्मचाºयांची ३० टक्के कपात करण्याचे धोरण राबविले आहे.

शिक्षणात खासगीकरण आणून कंपन्यांना संधी दिली आहे. अंशदायी पेन्शनमुळे कर्मचाºयांचा भविष्यकाळ अंध:कारमय झाला आहे. वीज मंडळाच्या तीन्ही कंपन्यांमध्येही ४० टक्के नोकरकपातीचे धोरण आहे. या प्रश्नांवर संघटना चर्चेला गेल्या तरी मंत्री, सचिव व्यवस्थित बोलत नाहीत. झोपेच सोंग घेतलेल्यांना जाग आणण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रित येऊन राज्यस्तरीय समन्वय समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. समन्वय समितीच्या झेंड्याखाली राज्यभर एल्गार करून सरकारला धोरण बदलण्यास भाग पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.

जे. जे. महाडिक, दादासाहेब पाटील, मुश्ताक पटेल यांनीही सरकारच्या धोरणावर जोरदार टीका करुन शेतकरी, सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. सरकारने असेच धोरण ठेवले, तर भविष्यात शासकीय संस्थाच मोडकळीस येण्यास मदत होणार आहे. शासकीय कार्यालयात उद्योजकांची मुलं काम करीत नसून, शेतकºयांचीच मुलं नोकरी करीत आहेत. येथील नोकºयांची कपात झाल्यास शेतकºयांच्या मुलांनी जायचे कुठे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.या बैठकीत राज्यभर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दि. ९ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या कºहाड येथील समाधीच्या ठिकाणी राज्यातील सर्व शासकीय, जिल्हा परिषद आणि शिक्षक संघटनांच्या राज्यपातळीवरील नेत्यांची बैठक बोलाविली आहे. या ठिकाणावरुनच राज्यभर समन्वय समितीच्या झेंड्याखाली कर्मचारी एल्गार करणार आहेत, असेही अरुण खरमाटे व जे. जे. महाडिक यांनी सांगितले.कंत्राटदार जगविण्याचे धोरण बंद कराराज्यातील सरकार कंत्राटदारांच्या इशाºयावर चालत आहे. बायोमेट्रिक मशीन तयार करणारा कंत्राटदार भेटला की लगेच बायोमेट्रिक हजेरीची कर्मचाºयांवर सक्ती करून राज्याच्या तिजोरीवर कोट्यवधीचा बोजा टाकला जात आहे. स्वॉफ्टवेअर पुरविणारा पुरवठादार मंत्री व सचिवांना भेटला की लगेच कोट्यवधी रुपयांची खरेदी करुन लगेच त्याची आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाते. या कंत्राटदारीतूनच शिक्षकांच्या बदल्या जिल्हास्तरावरुन राज्यपातळीवर गेल्या आहेत. प्रत्यक्षात ते यशस्वीही झाले नाही. याचपध्दतीने प्रत्येक ठिकाणी शासनाचे धोरण खरेदी केल्यानंतर फसत आहे; पण, शेतकरी, सामान्य व्यक्तीच्या कराच्या पैशातील कोट्यवधी रुपये कंपन्यांच्या घशात घातले जात आहेत. या धोरणाला तीव्र विरोध करण्यासाठी राज्यभर आंदोलन छेडणार आहे, असेही समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी सांगितले.सांगलीत शनिवारी सर्व शासकीय कर्मचारी संघटनांच्या कृती समन्वय समितीच्या बैठकीत आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्वप्नाली माने, मुश्ताक पटेल, दादासाहेब पाटील, सुभाष मरीगुद्दी, पी. एन. काळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली