शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

सरकारचे धोरण कामगार, शेतकरीविरोधी सांगली जिल्हा कृती समन्वय समितीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 00:15 IST

सांगली : शासकीय नोकरीमध्ये ३० टक्के कपात, शिक्षणातील खासगीकरण, कंत्राटी नोकरभरती, अंशदायी पेन्शन, शिक्षक बदल्या ही सरकारची धोरणे

ठळक मुद्देधोरणाविरोधात संघटित एल्गार; नऊ जानेवारीला राज्यातील नेत्यांची कऱ्हाड मध्ये बैठक

सांगली : शासकीय नोकरीमध्ये ३० टक्के कपात, शिक्षणातील खासगीकरण, कंत्राटी नोकरभरती, अंशदायी पेन्शन, शिक्षक बदल्या ही सरकारची धोरणे कर्मचाऱ्यांच्या विरोधातील आहेत. शेतकऱ्यांना ही भरभरून सरकार देत आहे, असाही भाग नाही. सरकारच्या या धोरणामुळे कर्मचारी, शेतकºयांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असा आरोप जिल्हा कृती समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी केला. सर्व संघटनांनी एकत्रित येऊन सरकारविरोधात एल्गार करण्यासाठी राज्यस्तरीय नेत्यांची दि. ९ जानेवारी २०१८ ला कºहाड येथे बैठक आयोजित केली आहे.

राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटना, जिल्हा परिषदेच्या सर्व संघटना, शिक्षक, आरोग्य कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांची सांगलीत शनिवारी बैठक झाली. या बैठकीस आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब पाटील, राज्य उपाध्यक्षा स्वप्नाली माने, जिल्हाध्यक्ष सुभाष मरीगुद्दी, अध्यक्ष एम. डी. जेऊर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष जे. के. महाडिक, सरचिटणीस पी. एन. काळे, कास्टाईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष धोंडिराम बेडगे, आरोग्य संघटनेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, परिचर संघटना अध्यक्ष सुभाष अर्जुने, जि. प. लेखा संघटना अध्यक्ष अशोक पाटील, कार्याध्यक्ष विजय डांगे,अल्पसंख्यांक कर्मचारी अध्यक्षा अध्यक्ष मुश्ताक पटेल, शिक्षक संघटना सरचिटणीस शशिकांत माणगावे, शिक्षक समितीचे सरचिटणीस बाबासाहेब लाड, मागासवर्गीय शिक्षक संघटना अध्यक्ष संतोष कदम, पदवीधर संघटना जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव भोसले आदी उपस्थित होते.

आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्यध्यक्ष अरुण खरमाटे म्हणाले की, राज्य सरकारचे कर्मचारी आणि शेतकरी हितापेक्षा त्यांना मानसिक त्रास देण्याचे धोरण आहे. शिक्षक बदल्या जिल्हास्तरावरुन एखाद्या कंपनीच्या भल्यासाठी राज्यस्तरावर नेल्या. नाहक शिक्षकांची फरफट चालू झाली आहे. कर्मचाºयांची ३० टक्के कपात करण्याचे धोरण राबविले आहे.

शिक्षणात खासगीकरण आणून कंपन्यांना संधी दिली आहे. अंशदायी पेन्शनमुळे कर्मचाºयांचा भविष्यकाळ अंध:कारमय झाला आहे. वीज मंडळाच्या तीन्ही कंपन्यांमध्येही ४० टक्के नोकरकपातीचे धोरण आहे. या प्रश्नांवर संघटना चर्चेला गेल्या तरी मंत्री, सचिव व्यवस्थित बोलत नाहीत. झोपेच सोंग घेतलेल्यांना जाग आणण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रित येऊन राज्यस्तरीय समन्वय समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. समन्वय समितीच्या झेंड्याखाली राज्यभर एल्गार करून सरकारला धोरण बदलण्यास भाग पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.

जे. जे. महाडिक, दादासाहेब पाटील, मुश्ताक पटेल यांनीही सरकारच्या धोरणावर जोरदार टीका करुन शेतकरी, सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. सरकारने असेच धोरण ठेवले, तर भविष्यात शासकीय संस्थाच मोडकळीस येण्यास मदत होणार आहे. शासकीय कार्यालयात उद्योजकांची मुलं काम करीत नसून, शेतकºयांचीच मुलं नोकरी करीत आहेत. येथील नोकºयांची कपात झाल्यास शेतकºयांच्या मुलांनी जायचे कुठे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.या बैठकीत राज्यभर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दि. ९ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या कºहाड येथील समाधीच्या ठिकाणी राज्यातील सर्व शासकीय, जिल्हा परिषद आणि शिक्षक संघटनांच्या राज्यपातळीवरील नेत्यांची बैठक बोलाविली आहे. या ठिकाणावरुनच राज्यभर समन्वय समितीच्या झेंड्याखाली कर्मचारी एल्गार करणार आहेत, असेही अरुण खरमाटे व जे. जे. महाडिक यांनी सांगितले.कंत्राटदार जगविण्याचे धोरण बंद कराराज्यातील सरकार कंत्राटदारांच्या इशाºयावर चालत आहे. बायोमेट्रिक मशीन तयार करणारा कंत्राटदार भेटला की लगेच बायोमेट्रिक हजेरीची कर्मचाºयांवर सक्ती करून राज्याच्या तिजोरीवर कोट्यवधीचा बोजा टाकला जात आहे. स्वॉफ्टवेअर पुरविणारा पुरवठादार मंत्री व सचिवांना भेटला की लगेच कोट्यवधी रुपयांची खरेदी करुन लगेच त्याची आॅनलाईन प्रक्रिया राबविली जाते. या कंत्राटदारीतूनच शिक्षकांच्या बदल्या जिल्हास्तरावरुन राज्यपातळीवर गेल्या आहेत. प्रत्यक्षात ते यशस्वीही झाले नाही. याचपध्दतीने प्रत्येक ठिकाणी शासनाचे धोरण खरेदी केल्यानंतर फसत आहे; पण, शेतकरी, सामान्य व्यक्तीच्या कराच्या पैशातील कोट्यवधी रुपये कंपन्यांच्या घशात घातले जात आहेत. या धोरणाला तीव्र विरोध करण्यासाठी राज्यभर आंदोलन छेडणार आहे, असेही समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी सांगितले.सांगलीत शनिवारी सर्व शासकीय कर्मचारी संघटनांच्या कृती समन्वय समितीच्या बैठकीत आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्वप्नाली माने, मुश्ताक पटेल, दादासाहेब पाटील, सुभाष मरीगुद्दी, पी. एन. काळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीSangliसांगली