शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पेयजल योजनेत शासकीय गोंधळ

By admin | Updated: September 27, 2015 00:45 IST

सात महिन्यांपासून कामे ठप्प : जिल्ह्यातील ८२० गावे-वाड्यांचा २१७ कोटींचा आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत

अशोक डोंबाळे/सांगली केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदानावरील मागेल तेथे पाणी योजना देण्याची महत्त्वपूर्ण राष्ट्रीय पेयजल योजना बंद करून नवीन योजना आणण्याच्या विचार शासनपातळीवर सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या योजनेतून जिल्ह्यातील ८२० गावे व वाड्या-वस्त्यांच्या २१७ कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यास शासनाने गेल्या सात महिन्यात मंजुरी दिलेली नाही. जी कामे निविदा प्रक्रियेत असतील, त्यांच्या निविदा काढू नयेत, असाही आदेश दिल्याने कामे ठप्प झाली आहेत. पूर्वीच्या आघाडी सरकारच्या योजना महायुतीच्या सरकारने बंद करून नवीन सुरू केल्या आहेत. आता राष्ट्रीय पेयजल योजनेतही बदल करण्यात येणार आहे. मात्र नवीन योजना करण्यासाठी शासनाने किती वेळ घ्यावा, हे ठरले पाहिजे. तसे होताना दिसत नसल्यामुळे जिल्ह्यातील ८२० गावे व वाड्या-वस्त्या पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. अन्य योजनांवर त्यांना अवलंबून राहावे लागत आहे. वास्तविक राज्य आणि केंद्र शासनाकडे राष्ट्रीय पेयजल योजनेचे प्रस्ताव डिसेंबरमध्ये पोहोचले पाहिजेत. त्यानुसार जिल्ह्यातील ८२० गावे व वाड्या-वस्त्यांचा २१७ कोटींचा आराखडा जिल्हा परिषद प्रशासनाने पाठविला आहे. डिसेंबरमध्ये आराखडा पोहोचल्यानंतर शासनाने जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत त्यास मंजुरी देणे अपेक्षित होते. १ एप्रिल २०१५ पासून नवीन आराखड्यानुसार पाणी योजनांची कामे सुरू होत असत. परंतु, यावर्षी डिसेंबरला आराखडे पाठविल्यानंतर आजअखेर मंजुरी मिळालेली नाही. त्यातच शासनाने जुन्या आराखड्यातील निविदा प्रक्रियेत असणाऱ्या कामांना स्थगिती दिली आहे. यामुळे सध्या राष्ट्रीय पेयजल योजनेतील सर्व कामे बंद आहेत. अपूर्ण कामासाठीही निधी नसल्याचे अधिकारी खासगीत सांगत आहेत. लोकप्रतिनिधींचे एवढ्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित होत आहे. विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार या प्रश्नावर आवाज उठवित नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे. आराखड्याबाबत लोकप्रतिनिधींचे मौन... राष्ट्रीय पेयजल योजनेत आपल्या गावाच्या समावेशासाठी जिल्हा परिषद सभागृहात लोकप्रतिनिधी आवाज उठवत असतात. आराखडा तयार झाल्यानंतर, शासनाने त्याचे काय केले, हे पाहण्याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष आहे. परिणामी गेल्या आठ महिन्यांपासून जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनता घोटभर पाण्यासाठी पाणी योजनांची वाट पाहत आहे.