शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
3
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
4
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
10
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
11
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
12
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
13
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
14
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
15
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
16
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
17
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
18
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
19
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
20
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
Daily Top 2Weekly Top 5

टेंभू उपसा योजनेसाठी ५०० कोटींचा निधी द्या

By admin | Updated: March 18, 2015 00:03 IST

ठिबकचा वापर करा : श्रमिक मुक्ती दलाची मोर्चाद्वारे मागणी

सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे मुख्य आणि पोटकालवे वगळता बंद जलवाहिनीद्वारेच पाणी शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ५०० कोटी रूपये निधीची येत्या अंदाजपत्रकात तरतूद करावी, या प्रमुख मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. कार्यकर्त्यांचा उद्रेक लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाच्या वारणाली (सांगली) येथील कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
सांगलीतील विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात झाली. कडेगाव, आटपाडी, खानापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी होते. वारणाली येथील पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर शिष्टमंडळाने सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाणे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पाटणकर यांनी टेंभू योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ५०० कोटींच्या निधी तरतूद करावी, ही मागणी शासनाकडे पाठवावी. शासनाने या नदीची तरतूद केली नाही, तर बेमुदत आंदोलनाला बसण्याचा इशारा दिला आहे. मुख्य आणि पोटकालवे वगळता शेतीला बंद जलवाहिनीद्वारेच पाणी द्यावे. टेंभू योजनेचे कार्यक्षेत्र असलेल्या सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील सात तालुक्यांतील शंभर टक्के शेतीला ठिबकद्वारेच पाणी देण्याच्या मागणीबाबतही चर्चा झाली. शासनाकडे मागण्यांचे निवेदन देण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. ठिबक सिंचन योजनेस प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासन सर्व सहकार्य करेल, असेही गुणाणे यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
आंदोलनात आनंदराव पाटील, विजयसिंह पाटील, मोहनराव यादव, अण्णासाहेब पत्की, अशोक लवटे, अमोल कुंभार, भारत पाटील, दत्तात्रय पाटील, जालिंदर मेटकरी आदींसह शेतकरी सहभागी होते. (प्रतिनिधी)