शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चौघांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : विटा आणि समडोळी (ता. मिरज) येथे पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा, तर मिरजवाडी (ता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : विटा आणि समडोळी (ता. मिरज) येथे पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा, तर मिरजवाडी (ता. वाळवा) येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने दोन तरुणांचा गुरुवारी बुडून मृत्यू झाला. चैतन्य सचिन वायदंडे (वय ९, रा. विटा) आणि शर्विल प्रशांत पाटील (१४, रा. समडोळी, ता. मिरज), अजय विजय भिसे (वय २४) व अजिंक्य रमेश जाधव (वय २५, दोघेही मूळ सांगवी, पुणे, सध्या रा. मिरजवाडी) अशी मृतांची नावे आहेत.

समडोळी येथील शर्विल पाटील आठवीत शिकत होता. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तो मित्रांसह पोहण्यास वारणा नदीत गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्यासोबतच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील तरुणांनी तसेच रेस्क्यू टीमच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला होता. त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

विटा येथील घटना जुना वासुंबे रस्त्यावरील हजारे मळा परिसरात घडली. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चौथीमध्ये शिकणारा चैतन्य वायदंडे परिसरातील विहिरीत पाेहण्यास गेला होता. परंतु त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले. चैतन्य कुटुंबीयांसमवेत हजारे मळा येथे राहण्यास होता. त्याचे वडील यंत्रमाग कामगार आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिरजवाडी (ता. वाळवा) येथे ग्रीन हाऊसच्या कामासाठी पुण्याहून अजय भिसे व अजिंक्य जाधव हे मजूर आले होते. मिरजवाडी येथील आवटी मळ्यात काम सुरू आहे. सकाळी नास्ता झाल्यानंतर मजुरांमधील एक तरुण नजीकच असलेल्या गायकवाड यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेला. त्यानंतर अजय भिसे व अजिंक्य जाधव हे दोघेही गेले. ते शेततळ्याच्या कडेला उभे होते. अचानक अजयचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला धरण्यासाठी अजिंक्य पुढे सरसावला, मात्र पोहता येत नसल्याने दोघेही शेततळ्यात बुडाले.

चौकट

पोहायला जाणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज

सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून, कोरोनामुळे शाळाही बंद आहेत. त्यामुळे मुले पालकांना सांगून तर कधी पालकांना न सांगता नदीमध्ये, विहिरीमध्ये, तलावांमध्ये पोहण्यास जातात. मुलांवर लक्ष ठेवल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात. जिल्ह्यात एकाच दिवशी दोन मुलांचा असा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.