शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

माजी संचालकांचा आज होणार फैसला !

By admin | Updated: April 13, 2015 00:01 IST

जिल्हा बँक : उच्च न्यायालयातील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष; अपात्रतेचे प्रश्नचिन्ह कायम

सांगली : सहकार विभागाच्या कारवाईविरोधात जिल्हा बॅँकेच्या १७ माजी संचालकांनी केलेल्या याचिकेवर सोमवारी, १३ एप्रिल रोजी फैसला होण्याची शक्यता आहे. या निर्णयावरच जिल्हा बॅँकेतील त्यांच्या राजकीय भवितव्याचा फैसलाही अवलंबून असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य सहकार विभागाच्या कारवाईने अडचणीत आले आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील ४ कोटी १८ लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी सध्या ४० तत्कालीन संचालकांची चौकशी सुरू आहे. चौकशी सुरू असतानाच लेखापरीक्षकांच्या शिफारसीनुसार लेखापरीक्षणाचे शुल्क संबंधित माजी संचालकांकडून वसूल करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी दिले होते. एकूण २० हजार रुपये शुल्क आहे. प्रत्येक संचालकावर ४२६ रुपयांची जबाबदारी येत असली तरी, एवढ्या कमी रकमेमुळे त्यांचे जिल्हा बॅँकेतील राजकारण संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहकार कायद्यातील नियमानुसार कोणतीही आर्थिक जबाबदारी निश्चित झाली आणि ती भरली तरी संबंधितांना निवडणूक लढविता येणार नाही. त्यामुळेच सध्या १७ माजी संचालकांनी मुुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ज्या आक्षेपार्ह रकमेची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही, त्याची जबाबदारी निश्चित झालेली नाही. त्यापूर्वीच आॅडिट फीची वसुली संबंधित संचालकांकडून कशी होऊ शकते?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेही याचिका दाखल केली होती. सहकारमंत्र्यांनी ही याचिका फेटाळली. मुंबई उच्च न्यायालयातही याच मुद्द्यावर आता याचिकेवर सुनावणी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननीपूर्वी न्यायालयीन निर्णय त्यांना अपेक्षित होता, मात्र तो अद्याप झालेला नाही. सोमवारी न्यायालयात याविषयीचा अंतिम निर्णय होईल, असे माजी संचालकांचे मत आहे. या निकालावरच जिल्हा बॅँकेतील त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे याकडे जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बॅँक निवडणुकीसाठी तत्कालीन ४० पैकी २३ संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. न्यायालयीन निर्णय झालेला नसल्याने सहकार विभागाच्या मागील कारवाईचा व जबाबदारी निश्चितीचा निर्णय गृहीत धरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २३ जणांचे अर्ज अवैध ठरविले आहेत. त्यामुळे न्यायालयीन निकालाचा यावर नेमका काय परिणाम होणार, याविषयीचीही उत्सुकता दिसत आहे.
उच्च न्यायालयात होणाऱ्या सोमवारच्या सुनावणीकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)

सुनावणीनंतरच हालचालींना गती
मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच जिल्हा बॅँकेसाठी राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत. ज्येष्ठ नेत्यांच्या भवितव्याचा फैसला झाल्याशिवाय जिल्हा बॅँकेसाठी कोणत्याही पक्षाच्या पॅनेलचे गणित करता येणार नाही. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या सुनावणीनंतरच जिल्ह्यातील राजकीय हालचाली गतिमान होण्याची चिन्हे आहेत.