शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा स्पर्धांची फी अडीचपटीने वाढली

By admin | Updated: August 14, 2015 00:05 IST

सर्वच वयोगटांतील खेळाडूंच्या फीमध्ये तब्बल अडीचपटीने वाढ करण्यात आली आहे.

बाहुबली : सध्या जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुरूआहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी भराव्या लागणाऱ्या सर्वच वयोगटांतील खेळाडूंच्या फीमध्ये तब्बल अडीचपटीने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह, शाळा, पालक व प्रशिक्षकांमध्ये फी बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.उदयोन्मुख व प्रतिभावान खेळाडू घडविणे, बालवयात खेळाची आवड निर्माण करणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून सरकारने २0१२ मध्ये क्रीडा धोरण निश्चित केले. त्यानुसार विविध स्तरांवर प्रशासनामार्फत स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे यावर्षी जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत जुलै ते आॅक्टोबर दरम्यान तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आज स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रशासनाने फीमध्ये अडीचपट वाढ केलेली आहे.वैयक्तिक क्रीडा प्रकारात मागील वर्षांपर्यंत एका खेळ बाबींसाठी १0 रुपये असलेली फी आता २५ रुपये, तर सांघिक क्रीडा प्रकारांत एका संघाकडून १५ ऐवजी आता ५0 रुपये फी आकारण्यात येत आहे. अशा अधिकच्या फी आकारणीमुळे ग्रामीण भागातील उद्योन्मुख खेळाडूंना फटका बसण्याची शक्यता आहे. एकीकडे शालेय स्तरावर खेळाडूंना आवश्यक सुविधा नसताना अशा प्रकारची फी वाढ म्हणजे मुलांना एका प्रकारे स्पर्धांपासून वंचित ठेवल्यासारखेच आहे.राज्य सरकारने २0१२ मध्ये मंजूर केलेल्या क्रीडा धोरणामध्ये तालुकास्तरावर क्रीडा संकुल उभारण्यापासून ते ग्रामीण भागातील मुलांना विविध क्रीडा प्रकारांत संधी मिळावी यासाठी अनेक सोयीसुविधा पुरविण्याचे निश्चित केले आहे. खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे तालुका, जिल्हा विभाग व राज्यस्तरापर्यंत आयोजन केले जाते. यामध्ये अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घ्यावा, ही अपेक्षा असते. परंतु, यंदाच्या पावसाळी स्पर्धांमध्ये प्रवेश फीमध्ये केलेली वाढ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित ठेवण्यासारखी आहे. याबाबत क्रीडा संघटना, शाळा व पालकांनी एकत्रित येऊन विरोध करणे गरजेचे आहे. जेणेकरून अधिक विद्यार्थी स्पर्धेत भाग घेतील. (वार्ताहर)मनमानी कारभारकोल्हापूर शहरातील शाळांकडून या स्पर्धांसाठी नियमित फी शिवाय अधिक फी घेतल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाने याबाबत तीव्र विरोध नोंदवून संबंधितांना समज देण्याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले आहे.कायद्याचे उल्लंघन आरटीई नियमानुसार ६ ते १४ वयोगटांतील मुलांना मोफत शिक्षणाची सोय शासनाने केली असताना १४ वर्षे वयोगटांतील क्रीडा स्पर्धेसाठी फी आकारणे म्हणजे आरटीई कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे या गटातील मुलांना क्रीडा स्पर्धांमध्येदेखील मोफत प्रवेश मिळालाच पाहिजे.