शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
2
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
3
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
4
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
5
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
6
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
7
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
8
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
9
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
10
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
11
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
17
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
18
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
19
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
20
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
Daily Top 2Weekly Top 5

नादखुळा!, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'घरीच' तयार केले 'इतके' हजार क्विंटल बियाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 17:13 IST

बाजारातील बियाण्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कृषी विभागाने घेतला निर्णय

सांगली : यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात तब्बल ३७, ८४८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पेरणीसाठी ३७ हजार क्विंटल बियाण्याची गरज भासणार आहे. यापैकी ग्राम बीजोत्पादनातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घरीच २९ हजार क्विंटल बियाणे तयार केले आहे. बाजारातील बियाण्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कृषी विभागाने हा निर्णय घेतला आहे.

गतवर्षी राबविण्यात आलेल्या ग्रामबीजोत्पादन अभियानात जिल्ह्यातील ३ हजार ५६७ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यातून तब्बल २९,३७७ क्विंटल घरचे सोयाबीन बियाणे तयार झाले आहे. कृषी विभागाने २ हजार ३१२ शेतकऱ्यांच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासली असता, १ हजार ८५९ शेतकऱ्यांच्या बियाण्यांची उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सुमारे ४,५५७ क्विंटल दर्जेदार बियाणे उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्यातील शेतकरी लवकर पेरणी करतात. त्यामुळे वेळेत बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागाने नियोजनबद्ध हालचाली सुरू केल्या आहेत. घरच्या बियाण्यांच्या वापरामुळे खर्चात बचत होण्याबरोबरच दर्जेदार उत्पादन मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

तालुकानिहाय सोयाबीन पेरणी क्षेत्र

तालुका / क्षेत्र हेक्टरमध्ये
वाळवा — ९,०००
मिरज — ६,६००
तासगाव — ५,२२०
शिराळा — ४,४७८
कडेगाव — ४,२००
कवठेमहांकाळ — ३,२००
पलूस — ३,२००
विटा — १,९५०

ग्रामबीजोत्पादनात वाळवा आघाडीवर

ग्रामबीजोत्पादन मोहिमेत वाळवा तालुक्यातील १ हजार २०० शेतकऱ्यांनी सहभाग घेत सर्वाधिक ७,५८० क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट गाठले आहे. मिरज तालुक्यात ५,७९७ क्विंटल, तर शिराळ्यात ४,१०० क्विंटल बियाणे उत्पादन झाले आहे.

तालुकानिहाय शेतकऱ्यांकडील बियाणे

तालुका / शेतकरी संख्या / बियाणे (क्विंटल)
शिराळा ६४५ / ४,१००
वाळवा १,२०० / ७,५८०
तासगाव ३४८ / २,७०५.३
खानापूर ३१२ / १,८७२
कवठेमहांकाळ १५ / ९००
मिरज ३३४ / ५,७९७.५
पलूस २५० / ३,६२६
कडेगाव ४६३ /२,६९६.७
एकूण ३,५६७ / २९,३७७.३

“खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागाने तयारी केली आहे. ग्रामबीजोत्पादन मोहिमेमुळे बाजारातील बियाण्यांवरील अवलंबित्व कमी होत असून, शेतकऱ्यांचीही खर्चात बचत होत आहे. घरच्या बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच त्यांचा वापर करण्याची गरज आहे.” - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Farmers Produce Thousands of Quintals of Seeds at Home!

Web Summary : Sangli farmers prepared 29,000 quintals of soybean seeds at home through the Gram Beej production scheme. This reduces reliance on market seeds. Walva leads in seed production. The agriculture department emphasizes using seeds with tested germination.