शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत नोकरीच्या बोगस नियुक्तीपत्रांमुळे खळबळ

By admin | Updated: April 13, 2015 00:03 IST

मिरज तालुका : फसवणुकीचा नवा फंडा; असंख्य तरुणांचा समावेश

मिरज : रेल्वे भरतीच्या आमिषाने आर्थिक फसवणुकीचे प्रकार सुरू असतानाच, आता बेरोजगारांना रेल्वेत नोकरीची बोगस नियुक्तीपत्रे पाठवून फसवणुकीचा नवीन फंडा सुरू झाला आहे. मिरज तालुक्यातील काहींनी नोकरीसाठी अर्जही न करता त्यांना थेट रेल्वेमंत्र्यांच्या सहीची नियुक्तीपत्रे आली आहेत. काहींनी या पत्रांवर विश्वास ठेवून बँक खात्यावर पैसे जमा केल्याने त्यांची फसवणूक झाली आहे.
बेरोजगारांना रेल्वेत नोकरीचे मोठे आकर्षण आहे. नोकरी लावण्यासाठी पैसे घेऊन फसवणुकीचे व बोगस नियुक्तीपत्रे देण्याचे प्रकार घडतात. मात्र भामट्यांनी बेरोजगार तरुणांना रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या नावावर रेल्वेत नोकरीची बोगस नियुक्तीपत्रे पाठविली आहेत. दूरध्वनीद्वारे घेतलेल्या मुलाखतीत नोकरीसाठी पात्र ठरला आहात. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना कारकून, ग्राहक सेवा प्रतिनिधी, तिकीट कलेक्टर, आदी पदांवर नियुक्ती केली आहे. सोबत उमेदवाराच्या माहितीचा अर्ज दिला असून, हा अर्ज भरून पाठवायचा आहे. मात्र नोकरीसाठी १० ते १२ हजार रुपये अनामत खात्यावर भरण्याची अट आहे.
भारतीय रेल्वेच्या नावाने पाठविलेल्या नियुक्तीपत्रावर रेल्वे भवन बिल्डिंग, पेट्रोल पंपाजवळ नवी मुंबई असा पत्ता असून, एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून, दिलेल्या बँक खाते क्रमांकावर अनामत भरायची आहे. नोकरीसाठी दोन दिवसांत अनामत रक्कम रोखीने बँक खात्यावर भरायची असून, दोन दिवसांत रक्कम जमा न केल्यास नियुक्ती रद्द होणार असल्याचे म्हटले आहे. भारतीय रेल्वे रोजगार हमी कायद्यांतर्गत राजमुद्रेचा शिक्का व रेल्वेमंत्र्यांच्या सहीने नोकरीची बोगस नियुक्तीपत्रे हाती पडल्याने तरुण चक्रावून गेले आहेत.
नियुक्तीपत्रे मिळालेल्या काहींनी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर ही पत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, रेल्वेत नोकरी मिळाल्याच्या आनंदात अनामत रक्कम भरलेल्यांची फसवणूक झाली आहे.


रेल्वे दक्षता अधिकाऱ्यांकडे तक्रार करणे
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामार्फत रेल्वेत नोकरभरती करण्यात येते. जाहिरातीद्वारे नोकरीसाठी अर्ज मागवून उमेदवारांना निमंत्रण पत्र पाठवून परीक्षा घेण्यात येते. उत्तीर्ण उमेदवारांची मुलाखतीनंतर अंतिम निवड होते. त्यानंतर रिक्त जागा असलेल्या विभागाकडे उमेदवारांची यादी पाठविण्यात येते. या विभागाकडून प्रमाणपत्रांची छाननी होऊन त्यांना नियुक्तीपत्र व नियुक्ती देण्यात येते. या भरती प्रक्रियेची माहिती नसलेल्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बोगस नियुक्तीपत्रे पाठविण्याचे प्रकार सुरू आहेत. बेरोजगारांची फसवणूक होऊ नये यासाठी या प्रकाराबाबत रेल्वे दक्षता अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे रेल्वे प्रवासी संघटनेचे सुकुमार पाटील यांनी सांगितले.


रेल्वेत नोकरीच्या आमिषाला कोणीही बळी पडू नये. अधिकृत परीक्षा व मुलाखतीशिवाय कोणालाही नोकरी मिळणे शक्य नाही. बोगस नियुक्तीपत्रे पाठविणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येणार आहे.
-एस. व्ही. रमेश,
स्थानक अधीक्षक, मिरज