शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या राजकारणात आरोपांचा धुरळा, सात रस्त्यांच्या मार्गात कोणाचा अडथळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सध्या रस्त्यावरुन राजकारण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सध्या रस्त्यावरुन राजकारण रंगले असताना सांगली जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या रस्त्यांची कामे राजकीय विरोधामुळे तर अनेक कामे अकारण थांबली आहेत. राजकारण्यांच्या या गोंधळात खराब रस्त्यांवरील नागरिकांच्या खस्ता काही केल्या कमी होत नाहीत.

चांगल्या रस्त्यांवर चांगले आरोग्यही अवलंबून आहे, मात्र सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या नशिबी चांगल्या रस्त्यांचे नव्हे खराब रस्त्यांचेच भोग आहेत. केवळ नागरिकांपुरताच हा विषय मर्यादीत नाही, तर व्यापारी पेठा, उद्योग विकसित होण्याचा मार्गही यामुळे खुंटला आहे. त्यामुळे प्रगतीऐवजी अधोगतीच्या मार्गावरुन जिल्ह्याची वाटचाल सुरु आहे. रस्ते, पूल होत असताना काही ठिकाणी पक्षांतर्गत राजकारण आले, तर काही ठिकाणी राजकारण नसतानाही रेंगाळलेपण आले आहे.

चौकट

हे रस्ते कोणी रोखले

सांगली ते पेठ या मार्गासाठी नितीन गडकरी यांनी २२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. तरीही काम सुरु नाही.

मिरजेतील शिवाजी रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात येणार आहे. यासाठीही निधी मंजूर करुनही त्याचे काम रखडले आहे.

कऱ्हाड ते तासगाव दरम्यान महामार्गाच्या निकृष्ट बांधकामाला शिवसेनेने विरोध केला आहे. त्यामुळे हे काम सध्या रेंगाळले आहे.

रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील धामणी ते मिरज दरम्यान फ्लायओव्हरच्या मागणीसाठी आंदोलन झाले आहे.

सांगली बसस्थानक ते अंकली या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला कोणाचाही विरोध नसताना सुरुवात झालेली नाही.

सांगलीतील आयर्विन पुलाला पर्यायी असलेला जवळचा पूल उभारण्याचे काम भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंजूर करुन आणले असतानाही त्याला होत असलेल्या विरोधामुळे तो बंद आहे.

सांगली ते विटा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग केल्यानंतरही त्याच्या कामाचा रस्ता बंद आहे.

कोट

शिवसेनेने कऱ्हाड ते तासगाव दरम्यानच्या रस्त्याच्या कामाला त्याच्या निकृष्ट दर्जामुळे विरोध केला होता. गडकरींचे नाव रस्ते कामासाठी घेतले जाते. त्यामुळे अशा निकृष्ट कामामुळे त्यांचेच नाव खराब होईल. त्यामुळे ठेकेदारासाठी नव्हे तर जनतेसाठी रस्ते करावेत.

- संजय विभुते, जिल्हाप्रमुख, शिवसेना

कोट

चांगले रस्ते होण्यासाठी सर्वांचाच आग्रह असला पाहिजे. रस्ते कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या शासकीय यंत्रणांनी याबाबत अधिक सतर्क असले पाहिजे. पूर्वी दहा वर्षे रस्ते टिकत होते. आता तशी परिस्थिती नाही. राजकारण करण्यापेक्षा चांगले रस्ते व्हावेत, ही अपेक्षा.

- अविनाश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

कोट

गडकरी यांनी मंजूर केलेले रस्ते कोणाचाही विरोध नसताना का सुरु झालेले नाहीत. आम्हाला राजकारण करायचे नाही, पण मंजूर केलेले रस्ते तरी लवकरात लवकर पूर्ण करावेत.

- पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

कोट

जिल्ह्याचा विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रसंगी सर्व पक्षांनी एकत्रित ताकद लावावी. निवडणुकीत जरुर वादविवाद असावेत, पण विकासकामात राजकारण आणता कामा नये. मंजूर झालेले पैसे परत जाणार नाहीत किंवा काम थांबणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

- पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप