शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

दुष्काळात पाण्याच्या व्यवसायाचा सुकाळ : आटपाडी तालुक्यात उत्पन्नाचा नवा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 01:25 IST

अविनाश बाड । आटपाडी : पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने आटपाडी तालुक्यातील लोकांचे हाल सुरू केले आहेत. इथे पाण्याचा धंदा मात्र ...

ठळक मुद्देशासकीय यंत्रणेचा नाकर्तेपणा; दहा रुपयाला मिळते घागरभर पाणी

अविनाश बाड ।आटपाडी : पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने आटपाडी तालुक्यातील लोकांचे हाल सुरू केले आहेत. इथे पाण्याचा धंदा मात्र भलताच तेजीत आला आहे. शासकीय पाण्याचे टँकर अंतर वाचवून पैसे मिळविण्यासाठी कुठूनही, कसलेही पाणी आणत आहेत. याचा फायदा शुद्ध पाणी विकणाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरवर शासन लाखो रुपये खर्च करत असताना नागरिकांना १० रुपयाला एक घागर या दराने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

आटपाडी तालुक्यात यंदा पावसाच्या अभावामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दि. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी तालुक्यात आंबेवाडीला पहिला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु झाला. सध्या तालुक्यात ७ गावात आणि १२७ वाड्या-वस्त्यांवर ११ टँकरच्या ३५ खेपांनी कागदोपत्री पाणी पुरवठा सुरु आहे. आधीच माणसी २० लिटरप्रमाणे पाणी मंजूर केले जाते. त्यात कधीच पूर्ण खेपा केल्या जात नाहीत. त्यामुळे जेव्हा टँकरचे पाणी मिळेल तेव्हा पाणी टंचाईने त्रासलेले नागरिक मिळेल तसले पाणी निमूटपणे घेतात. पण खारट, गढूळ साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे पाणी पिल्याने लोकांना पोटाचे आजार होऊ लागले आहेत. यावर डॉक्टरांकडून पिण्यायोग्य पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे. सध्या तालुक्यातील २३ हजार ९०८ एवढी लोकसंख्या टँकरवर अवलंबून आहे. नागरिकांना नाईलाजाने पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. तालुक्यात बहुतेक सर्व गावात घरोघरी लोक पिण्याचे पाणी विकत घेत आहेत. ५ रुपयाला २० लिटरपासून ते ४० रुपयांना २० लिटर या दराने पाणी विकणारे अनेक प्रकल्प तालुक्यात आहेत.

आटपाडीत फोन केला की घरपोच पाणी पुरवठा केला जातो. तर गावोगावी दररोज फिरुन शुद्ध पिण्याचे पाणी विकले जात आहे. आता शुद्ध असल्याचा दावा करुन विकले जाणारे हे पाणीसुद्धा खरेच आरोग्यास किती हितकारक आहे, हा चौकशीचा भाग आहे. लाखो रुपये खर्चून शासनाचे टँकर वेळेत येत नाहीत; मात्र खासगी विकतचे पाणी दररोज वेळेत उपलब्ध होत आहे.शासकीय पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी निंबवडे येथील हिराबाई देवडकर यांची विहीर, आटपाडी ग्रामपंचायतीची तलावाखालील विहीर, जलशुद्धीकरण केंद्र, आटपाडी, राजेवाडी येथील सुरेश कोडलकर आणि झरे येथे भगवान पाटील यांची विहीर अधिग्रहण केलेली आहे. टँकरसाठी याच विहिरीतून पाणी भरणे बंधनकारक आहे. टँकरचालकांनी खेपा अंतर चूकवू नये, यासाठी सध्या जीपीएस प्रणालीचा वापर केला जात आहे. तरीही टँकरवाले खेपात आणि पाण्यात गोलमाल करुन लोकांचे हाल करीत आहेत. विहिरीतील आणि जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पिण्यायोग्य कसे येत नाही, यावर कुणीच गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही.

अनेक टँकर शासकीय पाणी पुरवठा असे लिहिणे बंधनकारक असताना तसा फलक लावण्यात आलेला नाही. टँकरच्या क्षमतेबद्दल शंका व्यक्त केल्या जात आहेत. टँकरद्वारे पिण्यासाठी पुरविले जाणारे पाणी शुद्ध अथवा निर्जुंतक असल्याची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात नसल्याचे वास्तव आहे. टँकरद्वारे मंजूर असलेल्या पूर्ण खेपा दररोज विनाखंड टाकल्या जात नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.टँकरचालक : मालामालवारंवार येणाºया दुष्काळाने तालुकावासीयांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी हाल सहन करावे लागतात. टँकरच्या मंजुरीपासून बिले अदा करण्यापर्यंतच्या प्रवासात सरकारी बाबंूना टक्केवारी मिळते. सध्या १० हजार लिटर क्षमतेच्या टँकरला दिवसाला १११० रुपये अधिक १२ रुपये किमी दराने भाडे मिळते. अंतर आणि खेपा वाचवून टँकरवाले मालामाल होतात, तर ग्रामपंचायतीकडून खेपा झाल्याच्या नोंदीसाठी टँकरवाल्यांकडून सरपंचांसह पदाधिकारी ग्रामसेवक मलिदा खातात. आता खासगी शुद्ध पाणीवाले फिरुन थेट लोकांच्या खिशातून पैसे मिळवत आहेत.हे व्हायला हवेटँकरने पिण्यायोग्य शुद्ध पाणीच पुरवठा करायला हवा शिवाय या हागणदारीमुक्त तालुक्यात आता घरोघरी शौचालये झाली आहेत. पण शासन माणसी २० लिटरच पाणी मंजूर करते. त्यातले मिळते किती हा प्रश्नच आहे. या निकषात बदल करायला हवा. २०१३ च्या दुष्काळी परिस्थितीत माणसांबरोबर मोठ्या जनावराला ३० लिटरप्रमाणे पाणी टँकरने दिले होते. ते यावर्षीही द्यायला हवे. सध्या टँकरशिवाय १८ विहिरी आणि ३ बोअर दररोज ४०० रुपये देऊन पिण्यासाठी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. यांच्यासह टँकरवर अंमलबजावणीसाठी स्वतंत्र पथक नेमून फसवणूक करणाºयांवर फौजदारी दाखल करावी.विठलापूर (ता. आटपाडी) येथे १० रुपयाला घागर या दराने नागरिक पिण्याचे पाणी विकत घेत आहेत.

 

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई