शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात पाण्याच्या व्यवसायाचा सुकाळ : आटपाडी तालुक्यात उत्पन्नाचा नवा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 01:25 IST

अविनाश बाड । आटपाडी : पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने आटपाडी तालुक्यातील लोकांचे हाल सुरू केले आहेत. इथे पाण्याचा धंदा मात्र ...

ठळक मुद्देशासकीय यंत्रणेचा नाकर्तेपणा; दहा रुपयाला मिळते घागरभर पाणी

अविनाश बाड ।आटपाडी : पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने आटपाडी तालुक्यातील लोकांचे हाल सुरू केले आहेत. इथे पाण्याचा धंदा मात्र भलताच तेजीत आला आहे. शासकीय पाण्याचे टँकर अंतर वाचवून पैसे मिळविण्यासाठी कुठूनही, कसलेही पाणी आणत आहेत. याचा फायदा शुद्ध पाणी विकणाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरवर शासन लाखो रुपये खर्च करत असताना नागरिकांना १० रुपयाला एक घागर या दराने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

आटपाडी तालुक्यात यंदा पावसाच्या अभावामुळे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दि. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी तालुक्यात आंबेवाडीला पहिला पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरु झाला. सध्या तालुक्यात ७ गावात आणि १२७ वाड्या-वस्त्यांवर ११ टँकरच्या ३५ खेपांनी कागदोपत्री पाणी पुरवठा सुरु आहे. आधीच माणसी २० लिटरप्रमाणे पाणी मंजूर केले जाते. त्यात कधीच पूर्ण खेपा केल्या जात नाहीत. त्यामुळे जेव्हा टँकरचे पाणी मिळेल तेव्हा पाणी टंचाईने त्रासलेले नागरिक मिळेल तसले पाणी निमूटपणे घेतात. पण खारट, गढूळ साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे पाणी पिल्याने लोकांना पोटाचे आजार होऊ लागले आहेत. यावर डॉक्टरांकडून पिण्यायोग्य पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे. सध्या तालुक्यातील २३ हजार ९०८ एवढी लोकसंख्या टँकरवर अवलंबून आहे. नागरिकांना नाईलाजाने पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. तालुक्यात बहुतेक सर्व गावात घरोघरी लोक पिण्याचे पाणी विकत घेत आहेत. ५ रुपयाला २० लिटरपासून ते ४० रुपयांना २० लिटर या दराने पाणी विकणारे अनेक प्रकल्प तालुक्यात आहेत.

आटपाडीत फोन केला की घरपोच पाणी पुरवठा केला जातो. तर गावोगावी दररोज फिरुन शुद्ध पिण्याचे पाणी विकले जात आहे. आता शुद्ध असल्याचा दावा करुन विकले जाणारे हे पाणीसुद्धा खरेच आरोग्यास किती हितकारक आहे, हा चौकशीचा भाग आहे. लाखो रुपये खर्चून शासनाचे टँकर वेळेत येत नाहीत; मात्र खासगी विकतचे पाणी दररोज वेळेत उपलब्ध होत आहे.शासकीय पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी निंबवडे येथील हिराबाई देवडकर यांची विहीर, आटपाडी ग्रामपंचायतीची तलावाखालील विहीर, जलशुद्धीकरण केंद्र, आटपाडी, राजेवाडी येथील सुरेश कोडलकर आणि झरे येथे भगवान पाटील यांची विहीर अधिग्रहण केलेली आहे. टँकरसाठी याच विहिरीतून पाणी भरणे बंधनकारक आहे. टँकरचालकांनी खेपा अंतर चूकवू नये, यासाठी सध्या जीपीएस प्रणालीचा वापर केला जात आहे. तरीही टँकरवाले खेपात आणि पाण्यात गोलमाल करुन लोकांचे हाल करीत आहेत. विहिरीतील आणि जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पिण्यायोग्य कसे येत नाही, यावर कुणीच गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही.

अनेक टँकर शासकीय पाणी पुरवठा असे लिहिणे बंधनकारक असताना तसा फलक लावण्यात आलेला नाही. टँकरच्या क्षमतेबद्दल शंका व्यक्त केल्या जात आहेत. टँकरद्वारे पिण्यासाठी पुरविले जाणारे पाणी शुद्ध अथवा निर्जुंतक असल्याची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात नसल्याचे वास्तव आहे. टँकरद्वारे मंजूर असलेल्या पूर्ण खेपा दररोज विनाखंड टाकल्या जात नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे.टँकरचालक : मालामालवारंवार येणाºया दुष्काळाने तालुकावासीयांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी हाल सहन करावे लागतात. टँकरच्या मंजुरीपासून बिले अदा करण्यापर्यंतच्या प्रवासात सरकारी बाबंूना टक्केवारी मिळते. सध्या १० हजार लिटर क्षमतेच्या टँकरला दिवसाला १११० रुपये अधिक १२ रुपये किमी दराने भाडे मिळते. अंतर आणि खेपा वाचवून टँकरवाले मालामाल होतात, तर ग्रामपंचायतीकडून खेपा झाल्याच्या नोंदीसाठी टँकरवाल्यांकडून सरपंचांसह पदाधिकारी ग्रामसेवक मलिदा खातात. आता खासगी शुद्ध पाणीवाले फिरुन थेट लोकांच्या खिशातून पैसे मिळवत आहेत.हे व्हायला हवेटँकरने पिण्यायोग्य शुद्ध पाणीच पुरवठा करायला हवा शिवाय या हागणदारीमुक्त तालुक्यात आता घरोघरी शौचालये झाली आहेत. पण शासन माणसी २० लिटरच पाणी मंजूर करते. त्यातले मिळते किती हा प्रश्नच आहे. या निकषात बदल करायला हवा. २०१३ च्या दुष्काळी परिस्थितीत माणसांबरोबर मोठ्या जनावराला ३० लिटरप्रमाणे पाणी टँकरने दिले होते. ते यावर्षीही द्यायला हवे. सध्या टँकरशिवाय १८ विहिरी आणि ३ बोअर दररोज ४०० रुपये देऊन पिण्यासाठी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. यांच्यासह टँकरवर अंमलबजावणीसाठी स्वतंत्र पथक नेमून फसवणूक करणाºयांवर फौजदारी दाखल करावी.विठलापूर (ता. आटपाडी) येथे १० रुपयाला घागर या दराने नागरिक पिण्याचे पाणी विकत घेत आहेत.

 

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई