शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
2
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
3
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
4
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
5
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
6
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
7
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
8
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
9
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
10
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
11
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
12
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
13
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
14
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
15
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
16
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
17
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
18
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
19
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
20
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

राजेवाडी एक्स्चेंजमधील ‘डायलटोन’ गप्पच!

By admin | Updated: February 16, 2015 23:11 IST

फोन संख्या घटली : सेवा मोडकळीस, दूरध्वनी केवळ बिलास भार

लक्ष्मण खटके - लिंगीवरे राजेवाडी एक्स्चेंजमधील वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे लिंगीवरे, राजेवाडी येथील सुमारे ९० टक्के लॅँडलाईन फोन ग्राहकांनी बंद केले आहेत. ‘डायलटोन’ वारंवार गप्प होत असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत उरलेले दूरध्वनी कनेक्शनही केवळ बिल भरण्यापुरतेच राहिले आहेत.आटपाडी तालुक्यात राजेवाडी एक्स्चेंज जिल्ह्याच्या व तालुक्याच्या शेवटच्या व दुर्गम टोकाला आहे. गेल्या बारा वर्षांपूूर्वीपासून सुरू करण्यात आलेल्या एक्स्चेंजमध्ये बापूराव साठे नामक आॅपरेटर स्वतंत्रपणे नेमण्यात आला होता. त्यावेळी सुमारे १९५ फोनधारक तयार ग्राहक करून ग्राहकसेवा चोखपणे बजावली जात होती. अधूनमधून बिघाड झाल्यास राजेवाडी येथे एक्स्चेंजमध्येच फोन केला की लगेच दुरुस्तीबाबत प्रयत्न करून दूरध्वनीची सेवा सुरळीतपणे सुरू करण्यात येत होती. राजेवाडी एक्स्चेंजला जोडणारी केबल दिघंची येथून जमिनीखालूून आणली आहे. या भागात अलीकडे शेतकऱ्यांनी कालव्यांमधून जमिनीखालून जलवाहिन्या टाकण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. अनेकदा जमिनीत जलवाहिनी टाकण्यासाठी खुदाई करताना ही केबल तुटली जाते. पुन्हा जोड दिल्यानंतर त्यामध्ये पाणी, चिखलाची राड जाऊन सेवा सुरळीत मिळणे अवघड जाते. बीएसएनएलने कायम सेवेतील आॅपरेटर काढल्यानंतर कंत्राटी स्वरुपात कामगारांना ठेका दिला. परंतु कमी उत्पन्न आणि काम जास्त यामुळे कामगारांची कुचंबणा होऊ लागली. अन्य एक्स्चेंजच्या आॅपरेटरला जादा काम करण्यास लावून कामाचा बोजा वाढला. तसेच वारंवार विस्कळीतपणा येऊन त्यांना काम करणे अवघड झाले. त्यामुळे लॅँडलाईन सेवेतील पूर्ण विश्वास नष्ट होऊन सर्रास ग्राहकांनी केवळ भुर्दंड सहन करण्यापेक्षा फोनसेवा बंद केली व मोबाईल सेवेचा आधार घेतला. वाढत्या मोबाईलमुळे दूरध्वनी फोनला पूर्णविराम मिळाला. आज १६५ पैकी केवळ दोनच फोन सेवा लिंगीवरे येथे नाईलाजाने रेकॉर्डवर सुरू आहेत. प्रत्यक्षात मात्र एकदाही फोन करण्यास व येण्यास याचा फायदा होत नाही. राजेवाडी गावातही अशीच स्थिती झाली आहे. एकूणच या साऱ्या प्रकारांबाबत ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतमध्ये इंटरनेट कनेक्शनसाठी टेलिफोन सुरू ठेवण्यात आला आहे. परंतु त्याचा कधीही लाभ झाला नाही. ही सेवाही नियमितपणे चाललीच नाही.
- आगतराव खांडेकर,
सरपंच, लिंगीवरे


‘लोकमत’चा पाठपुरावा
बंद असलेल्या फोनचे बिल वाढले म्हणून न्यायालयातून ग्राहकांना नोटिसा बजावण्यात आल्या. नाहकपणे ग्राहकांनी व्याजासह पैसे भरल्याशिवाय पर्यायच उरला नाही. या एक्स्चेंजमधील ग्राहकांनी फोन केले नसले तरी, कॉल नोंदी होऊन चार्ज भरावे लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यावरही ‘लोकमत’ने आवाज उठविला होता.

फोन बंद, बिलिंग सुरू
राजेवाडी एक्स्चेंजमधील फोन कायम बंदच आहेत. दुरुस्तीसाठी आटपाडी येथील कार्यालयात फोन केल्यापुरता फक्त एखादा दिवस फोन सुरू असतो. पुन्हा फोन नादुरुस्तच असतो. मात्र बिल हे नियमितपणे येणे सुरूच असते.