शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

खानापूरच्या ‘अग्रणी पॅटर्न’चा राज्यात डंका

By admin | Updated: September 10, 2015 00:37 IST

मुख्यमंत्री करणार पाहणी : दोन कोटी रुपयांचे नदी पुनरुज्जीवनाचे काम झाले पन्नास लाखात

दिलीप मोहिते ल्ल विटा गेल्या अनेक पिढ्यांपासून दुष्काळाने पाय रोवलेल्या खानापूर तालुक्याच्या पूर्व भागाला आता अग्रणी नदीच्या पुनरुज्जीवनामुळे हरितक्रांतीचा टिळा लागण्याचा क्षण अंतिम टप्प्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियान, लोकसहभाग व प्रशासनाच्या प्रयत्नातून खानापूर तालुक्यातून उगम पावलेल्या अग्रणी नदीपात्राचे २० कि.मी. अंतरापर्यंत खोलीकरण व रुंदीकरण पूर्ण केल्याने अग्रणी पुनरुज्जीवनाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे दुष्काळी खानापूर तालुक्यातील या ‘अग्रणी पॅटर्न’चा संपूर्ण महाराष्ट्रभर गवगवा झाला आहे. परिणामी, लोकसहभाग व प्रशासनाच्या अथक् परिश्रमातून सव्वादोन कोटीचे हे काम अवघ्या पन्नास लाखाच्या निधीत पूर्ण झाल्याने अग्रणी नदीने मोकळा श्वास सोडला आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या या अग्रणी पुनरुज्जीवनाच्या कामाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ते लवकरच अग्रणी नदीचा पाहणी दौरा करणार आहेत. खानापूर तालुक्यात दुष्काळ पाचवीला पूजलेला आहे. शेतीपाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात असलेल्या या खानापूर तालुक्यात ‘टेंभू’च्या माध्यमातून हरितक्रांती आणण्याचे प्रयत्न शासकीय व राजकीय पातळीवर झाले. परंतु, ‘टेंभू’पासून वंचित राहणाऱ्या खानापूर तालुक्याच्या पूर्व भागाला कायमस्वरूपी पाणी देण्याचा प्रयोग अयशस्वी झाला आहे. त्यामुळेच खानापूर तालुक्यातून उगम पावणाऱ्या अग्रणी नदीपात्राच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाची कल्पना समोर आली. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातून हे काम पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. परंतु, तालुक्याच्या कार्यक्षेत्रात या नदीचे २० कि.मी. अंतराचे पात्र आहे. हे काम पूर्ण करणे शासनाच्या निधीवर अवलंबून न ठेवता ते लोकसहभागातूनही पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रांताधिकारी सचिन इथापे व तहसीलदार सौ. अंजली मरोड यांनी विविध संस्था व लोकांना आवाहन केले. आ. अनिल बाबर यांनीही प्रयत्न केले. त्यामुळे सहकारी व सेवाभावी संस्थांनी साडेनऊ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला.