शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : इस्लामपुरातील पहिले चार कोरोनामुक्त रुग्ण घरी परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 20:21 IST

एकाच कुटुंबातील हे चौघे सौदी अरेबिया येथून १४ मार्च रोजी परतले होते. तेथून आल्यानंतर चार ते पाच दिवसांनी सर्दी आणि ताप येण्यास सुरुवात झाली.

ठळक मुद्देप्रबळ इच्छाशक्ती आणि प्रतिकारशक्तीच्या जोरावर हरवले कोरोनालाएकाच कुटुंबातील हे चौघे सौदी अरेबिया येथून १४ मार्च रोजी परतले होते२३ मार्चला चौघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरासह जिल्हा हादरून गेला होता

इस्लामपूर - शहरातील कोरोनाबाधित ठरलेले पहिले चार रुग्ण उपचारानंतर बरे होऊन सोमवारी महिन्याभरानंतर घरी परतले. शासकीय रुग्णवाहिकेतून या सर्वांना गांधी चौक परिसरातील घरी आणण्यात आले. कोरोनावर मात करत या चौघांनी प्रबळ शारीरिक प्रतिकारशक्ती आणि दुर्दम्य इच्छाशक्तीचे दर्शन घडवले.एकाच कुटुंबातील हे चौघे सौदी अरेबिया येथून १४ मार्च रोजी परतले होते. तेथून आल्यानंतर चार ते पाच दिवसांनी सर्दी आणि ताप येण्यास सुरुवात झाली. येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली. परदेश प्रवास करून आल्याने त्यांना घरीच थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे त्यांनी कानाडोळा केल्याने त्यांना मिरज येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात २१ मार्चच्या सायंकाळी दाखल करण्यात आले. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. २३ मार्चला चौघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरासह जिल्हा हादरून गेला. तेव्हापासून त्यांच्यावर मिरज येथे उपचार सुरू होते. १४ दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या पुन्हा तपासण्या करण्यात आल्या. हे चौघेही कोरोनामुक्त झाल्याचा अहवाल आला. तेथील आणखी १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्यानंतर या चौघांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे आगमन झाले. पालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.या सर्वांच्या आगमनापूर्वी आरोग्य यंत्रणेने संपूर्ण घराचे निर्जंतुुकीकरण करुन घेतले होते. घरातील सर्व भांडी व इतर साहित्यही निर्जंतुक करण्यात आले. घरी आल्यानंतर या चौघांना आरोग्य यंत्रणेमार्फत मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्हज देण्यात आले. घराच्या स्वच्छतेसाठीचे औषधही पुरविण्यात आले आहे. या सर्वांना आणखी १४ दिवस घरीच थांबण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागामार्फत दिवसातून दोनवेळा गृहभेट घेऊन त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाणार आहे.चौघांचा प्रवास१३ मार्चला सकाळी दिल्ली येथून मुंबई विमानतळावर आगमन.१३ मार्चला दिवसभर मुंबईत वास्तव्य.१४ मार्चला सकाळी इस्लामपूर येथे आगमन.१४ ते १८ मार्च शहरात कुटुंबीय, नातेवाईकांसह इतरांशी भेटीगाठी. १९ मार्च सर्दी, खोकला आल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात तपासणी. तेथे परदेश प्रवासामुळे घरी थांबण्याच्या सूचना; मात्र याकडे कानाडोळा करत २१ मार्चपर्यंत पुन्हा घराबाहेर वावर.२१ मार्चच्या सायंकाळी पोलीस बळाचा वापर करत सर्वांची मिरज येथे उपचारासाठी रवानगी.२२ मार्चला चौघांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले.२३ मार्चला सायंकाळी हे सर्व चौघे कोरोना पॉझिटिव्ह ठरल्याचा अहवाल प्राप्त.२० एप्रिल उपचारानंतर महिन्याभराने निवासस्थानी आगमन

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangliसांगली