शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 23:49 IST

संघासोबतच अभाविपचाही मोठा सहभाग : नवमतदारांसह २२ लाख तरुण मतदारांवर केले होते लक्ष केंद्रीत

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा व रालोआला घवघवीत यश मिळाले असून, महिला रोजगार योजनेला त्याचे श्रेय दिले जात आहे. मात्र, तळागाळातील मतदारांसोबतच नवमतदारांना मतदान केंद्रांपर्यंत खेचून आणण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका राहिली. संघाच्या ‘शत - प्रतिशत’ मतदानाच्या मोहिमेसोबतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचाही यावेळी सक्रिय सहभाग दिसून आला. निवडणुकीच्या दृष्टीने मागील काही महिन्यांपासून तेथे या संघटनांनी नवमतदारांसह २२ लाख तरुण मतदारांवर लक्ष केंद्रीत केले होते.

सन २०१५च्या निवडणुकीत भाजपला कमी मते मिळण्याचे खापर अनेकांनी संघावरच फोडले होते. मात्र, १० वर्षांतच भाजपच्या जागांचा ग्राफ प्रचंड वेगाने वर गेल्याचे वास्तव आहे.

सन २०१५मध्येबिहार निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्याचा विरोधकांनी मुद्दा केला होता. त्या निवडणुकीत संघाचे स्वयंसेवक मतदान मोहिमेतही सक्रिय नव्हते. त्याचा फटका भाजपला बसला व एका वर्षाअगोदर देशात सत्तेवर येऊनही भाजपच्या ३८ जागांचे नुकसान सहन करत ५३ जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र, २०२० व २०२५ या दोन्ही निवडणुकीत संघ परिवारातील संघटना सक्रिय राहिल्या. त्याचा फायदा पक्षाला झाल्याचे दिसून आले.

कुठे कॅम्पस ॲम्बेसेडर, तर कुठे यूथ क्लब

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निवडणूक घोषित होण्याअगोदरच तयारीला सुरुवात करण्यात आली होती. २४३ जागांवर परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हजारो बैठका घेतल्या. त्याचप्रमाणे कॅम्पस ॲम्बेसेडर, यूथ क्लब इत्यादींच्या माध्यमातून नवमतदारांशी संपर्क साधण्यावर भर देण्यात आला. अगदी क्रीडा स्पर्धा, रथयात्रा, निबंध स्पर्धांच्या माध्यमातूनही तरुणाईशी संपर्क करण्यात आला.

संघाच्या मतदानवाढीच्या आवाहनाला प्रतिसाद

संघाकडून सर्वच मतदारसंघांत मतदानवाढीसाठी गृहसंपर्क मोहीम चालविण्यात आली होती. विरोधकांनी त्याला त्रिशूल मोहीम असेदेखील नाव दिले होते. यादरम्यान स्वयंसेवकांनी घरोघरी जात मतदारांशी संपर्क साधला होता व त्यांना भाजपचे नाव न घेता राष्ट्रीय विचारांच्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. कुणालाही मतदान करा, मात्र मतदान करायला घराबाहेर निघा, असे प्रत्येक घरी स्वयंसेवक सांगत होते. २०१९मध्ये ५७.०७ टक्के मतदान झाले होते. मात्र, यंदा तो टक्का ६६.९१ टक्क्यांवर पोहोचला. भाजपचे लोकदेखील याचे श्रेय पटना येथील संघाच्या विजय निकेतन या कार्यालयात झालेल्या मतदान वाढीच्या नियोजन बैठकांना देत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's graph rises in Bihar post-RSS activity from 2015 to 2025.

Web Summary : RSS's voter mobilization efforts, particularly targeting young and new voters, significantly contributed to BJP's success in Bihar elections. Increased voter turnout, credited to RSS campaigns, boosted BJP's performance compared to 2015 when reduced RSS activity impacted results.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BiharबिहारBJPभाजपा