जिल्ह्यात ३६३ जणांना कोरोना; पाचजणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:27 AM2021-04-10T04:27:15+5:302021-04-10T04:27:15+5:30
सांगली : जिल्ह्यात सलग तिसऱ्यादिवशी पाचजणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने स्थिती चिंताजनक बनत चालली आहे. दिवसभरात ३६३ जणांना कोरोनाचे निदान ...
सांगली : जिल्ह्यात सलग तिसऱ्यादिवशी पाचजणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने स्थिती चिंताजनक बनत चालली आहे. दिवसभरात ३६३ जणांना कोरोनाचे निदान होतानाच २१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असतानाच मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने काळजी वाढली आहे. महापालिका क्षेत्रासह वाळवा, आटपाडी तालुक्यात रुसंख्या वाढत आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने शुक्रवारी आरटीपीसीआरअंतर्गत २०७० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात १३५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १५३५ चाचण्यांमधून २३३ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेणाऱ्या ३३८५ रुग्णांपैकी ४५० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ४०८ जण ऑक्सिजनवर, तर ४२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ५४६५६
उपचार घेत असलेले ३३८५
कोरोनामुक्त झालेेले ४९४३४
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८३७
शुक्रवारी दिवसभरात
सांगली ३४
मिरज २५
आटपाडी ६४
वाळवा ५४
जत ३६
शिराळा ३०
खानापूर २९
कडेगाव २१
कवठेमहांकाळ १८
तासगाव ११