शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या विकासासाठीच एकत्र

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

मोहनराव कदम : वांगी येथे शेतकरी विकास पॅनेल प्रचारार्थ बैठक

वांगी : तालुकास्तरीय राजकारण बाजूला ठेवून बाजार समितीच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तरी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागून जास्तीत जास्त मतदान करवून घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी केले.वांगी (ता. कडेगाव) येथे सोनहिरा साखर कारखान्याजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत ते बोलत होते.कदम म्हणाले, आम्ही कधीही लबाडीचे राजकारण केले नाही. सर्व मित्रपक्षांना बरोबर घेऊन शेतकरी विकास पॅनेल तयार केले आहे. आमच्याबरोबर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार अनिल बाबर यांच्यासह अन्य मंडळी असून ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढविणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गट-तट विसरून पॅनेलच्या विजयासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तालुक्यात असणारे एक न् एक मत हे झालेच पाहिजे. यासाठी युवक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. या पॅनेलमध्ये नवीन युवकांना संधी दिली आहे. त्यांनी या संधीचे सोने करून दाखविणे गरजेचे आहे. सोनहिरा कारखान्याने ताकारी योजनेसाठी ८२ लाख रूपये जमा केले असून योजनेचे पाणी लवकर शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.यावेळी नथुराम पवार, सुभाष मोरे, दीपक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती सदस्य सखाराम सूर्यवंशी, व्यंकटराव पवार, वांगीच्या सरपंच मनीषा कांबळे, सुभाष मोरे, येवलेवाडीचे माजी सरपंच संभाजी जगताप, पांडुरंग पोळ, बाबासाहेब सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी, ‘सोनहिरा’चे संचालक दिलीप सूर्यवंशी, युवराज कदम, माजी उपसभापती मोहन मोरे, संजय साळुंखे, अधिकराव जाधव यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)