शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वादाच्या बिकट वाटेवरून सामंजस्याची वहिवाट...

By admin | Updated: December 21, 2015 00:50 IST

तुरचीतील शेतकऱ्यांचा आदर्श : द्राक्षबाग काढून केला रस्ता - गुड न्यूज

तासगाव : इंच न् इंच जागेसाठी वादाच्या रक्तरंजित कहाण्या लिहल्या जात असतानाच, तासगाव तालुक्यातील तुरची येथील शेतकऱ्यांनी सामंजस्याची नवी कहाणी लिहून लोकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. तालुक्यातील अनेक गावांत शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात जाण्यासाठी रस्ते नाहीत. काही ठिकाणी रस्त्यांसाठी एकमेकांवर दावे दाखल आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार सुधाकर भोसले यांनी महाराजस्व अभियानांतर्गत मोहीम सुरु केली आणि तुरचीतील शेतकऱ्यांनी स्वत:च्या द्राक्षेबागांतील काही झाडे काढून तब्बल दीड किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला आहे.शेतीच्या रस्त्याचा प्रश्न अनेक शेतकऱ्यांसाठी डोकदुखी ठरत आहे. त्यातच बागायती शेती असेल आणि रस्ता नसेल, तर शेत असून अडचण आणि नसून खोळंबा, अशीच अवस्था असते. शेतीला रस्ता मिळावा, यासाठी प्रशासनाकडे दाखल होणाऱ्या दाव्यांची संख्याही मोठी आहे. दावा दाखल झाल्यानंतर अनेक वर्षे सुनावणीसाठी हेलपाटे मारून आणि वकिलासाठी पैसे मोजण्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे अशा पध्दतीने होणारे नुकसान टाळण्यासाठी तहसीलदार सुधाकर भोसले यांनी महाराजस्व अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियानांतर्गत तालुक्यातील सर्व पाणंद रस्ते खुले करणे, रस्ते नसलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन रस्त्याची सोय करुन देण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेचा लाभ तुरचीतील शेतकऱ्यांना झाला आहे. तुरची येथील अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी वाट नव्हती. द्राक्षबागा असलेल्या शेतकऱ्यांची रस्त्याअभावी मोठी गैरसोय होत होती. वाट मिळावी, यासाठी प्रशासनाकडे दावाही दाखल करण्यात आला होता. या ठिकाणच्या शेतकऱ्यांना तहसीलदार भोसले यांनी मार्गदर्शन केल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांनी रस्ता करण्यासाठी पुढाकार घेतला. खाशाबा चव्हाण, वसंत चव्हाण, राजाराम चव्हाण, रवींद्र चव्हाण, जगन्नाथ चव्हाण या शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी अडसर ठरणाऱ्या स्वत:च्या द्राक्षबागा तोडून रस्ता तयार केला. त्यामुळे तुरचीत लोकसभागातून दीड किलोमीटर लांबीचा रस्ता तयार झाला. (वार्ताहर)शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत पाणंद रस्ते खुले करुन देण्यासाठी विशेष मोहीम सुरु केली आहे. शेतकऱ्यांना रस्त्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे. शेतकऱ्यांची गैरसोय तसेच आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत आजअखेर २५ पाणंद रस्ते खुले केले आहेत. पाणंद रस्त्यांबाबत तक्रारी असल्यास प्रशासनाशी संपर्क साधवा. प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य केले जाईल.- सुधाकर भोसले, तहसीलदार, तासगाव.