शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
3
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
6
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
7
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
8
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
9
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
10
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
11
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
12
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
13
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
14
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
15
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
16
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
17
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
18
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
19
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
20
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडी ग्रामपंचायतीचे बजेट कोलमडले

By admin | Updated: March 18, 2015 00:04 IST

करवसुली थकली : विशेष मोहिमेस थंडा प्रतिसाद; ग्रामस्थांना सहकार्याचे आवाहने

आटपाडी : आटपाडी ग्रामपंचायतीने वसुलीसाठी खास मोहीम सुरू करूनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामपंचायतीचे ‘बजेट’ कोलमडले आहे. एकूण १ कोटी १८ लाख ३३ हजार ७९३ रुपये एवढ्या वसुलीच्या रकमेपैकी जेमतेम ३२ लाख रुपयांचा वसूल या २०१४-१५ या आर्थिक वर्षात झाला आहे.आटपाडी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचे तब्बल ८५ लाख रुपये एवढे वीजबिल थकित आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी वसुलीसाठी वारंवार विजेचे कनेक्शन तोडत आहे आणि तात्पुरती रक्कम भरुन पुन्हा जोडणी करुन देत आहे. ग्रामपंचायतीकडे एकूण ३६ कर्मचारी आहेत. त्यातील महिला सफाई कामगार ९, गटारीसह स्वच्छतागृहे सफाई कामगार ३, पाणीपुरवठा विभागाकडे ९, गळती काढण्यासाठी २, घंटागाडीसाठी २, कार्यालयातील कारकुन, शिपाई (प्रत्येकी एक) अशा एकूण ३६ कर्मचाऱ्यांना दरमहा २ लाख २० हजार रुपये पगार द्यावा लागतो.विहिरीतील मोटारींची वारंवार दुरुस्ती केलेली आणि पाणी पुरवठा विभागाची सध्या दीड लाख रुपये उधारी झालेली आहे. त्यामुळे आता पहिली बाकी दिल्याशिवाय दुकानदारही ग्रामपंचायतीला नवे साहित्य देण्यास नकार देत आहेत. पिण्याच्या पाण्यात टीसीएल पावडरचाही महिन्याला सुमारे २ लाख २० हजार एवढा खर्च होत आहे. त्यासाठी ग्रामस्थांची घरपट्टी आणि पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच स्वाती सागर, ग्रामविकास अधिकारी उत्तम पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे. (वार्ताहर)


विकास कमी, राजकारण जादा
आटपाडी या तालुक्याच्या मुख्य गावातील ग्रामपंचायतीचा कारभार कायम विकास कामांऐवजी राजकीय कुरघोड्यांमुळे कायम चर्चेत असतो. काही प्रभागातील नागरिक वसुलीला प्रचंड प्रतिसाद देतात, तर काही प्रभागातील नागरिकांना ग्रामपंचायतीच्या वसुलीचे कर्मचारी घाबरतात. अनेक ग्रामपंचायत सदस्यांमध्ये ठेका मिळवून त्यात डल्ला कसा मारता येईल, यासाठीच चढाओढ असल्याची चर्चा असते. नागरिकांनी वसुली न देण्यामागे हेही एक कारण लोक सांगत आहेत.
सध्या नागरिकांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी भरावी, अन्यथा नळ कनेक्शन तोडण्याचा अथवा कारवाई करण्याचा इशारा ध्वनिक्षेपकावरुन संपूर्ण गावात वाहन फिरवून आवाहन करण्यात येत आहे. पण लवकरच आटपाडी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांना दुखावणे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे कारवाईचा बार केवळ फुसका ठरल्याचे दिसत आहे.