शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

नीट वागा, अन्यथा ‘माजी नगरसेवक’ व्हाल!

By admin | Updated: August 13, 2015 23:17 IST

मदनभाऊंचा दम : काँग्रेसअंतर्गत वादावर नगरसेवकांच्या बैठकीत खरडपट्टी

सांगली : महापालिकेतील काँग्रेसअंतर्गत वादावर सत्ताधारी गटाचे नेते, माजी मंत्री मदन पाटील यांनी नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढली. पदाधिकारी, नगरसेवकांना डोस देताना ‘नीट वागा, अन्यथा ‘माजी नगरसेवक’ म्हणून पाटी लावायला तयार राहा’, असा दमही गद्दारी करण्याचे मनसुबे आखलेल्यांना भरला. केवळ आपलीच कामे प्रशासनाकडे न रेटता सर्वसामान्य नगरसेवकांची कामे करण्याचा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला. बुधवारी रात्री मदन पाटील यांच्या फार्म हाऊसवर नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला पाटीलसमर्थक ३० नगरसेवक उपस्थित होते, तर पतंगराव कदम गटाचे दहाजण गैरहजर होते. सध्या पालिकेतील काँग्रेसमध्ये पाटील-कदम गटात संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी समर्थकांची कानउघाडणी केली. कोणाची पावले वेडीवाकडे पडणार असतील, तर त्यांनी आतापासूनच माजी नगरसेवक व्हायला तयार व्हावे. यापुढे कुणाचीही गय केली जाणार नाही, असे पाटील यांनी सुनावले. काही नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल बैठकीत तक्रारी केल्या. पदाधिकारी केवळ आपल्या प्रभागातील कामे प्रशासनाकडे रेटतात. प्रशासनही त्यांचेच ऐकते. त्यामुळे सामान्य नगरसेवकांना न्याय मिळत नाही, असा नगरसेवकांचा सूर होता. पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या देताना त्यांनी पालिकेत पन्नास टक्के महिला नगरसेविका आहेत, त्यांची कामे होताना अडचणी येतात. या कामाचा पाठपुरावा पदाधिकाऱ्यांनी स्वत:हून करावा. नव्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन पालिकेचा कारभार करण्याची सूचना केली. ‘मला पालिकेतील सत्तेची चिंता नाही. मी कोणाशीही तडजोड करू शकतो,’ असे सूचक वक्तव्य करीत मदनभाऊंनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशी जुळलेला राजकीय संबंध उघड करीत एकप्रकारे कारभाऱ्यांना इशाराच दिला. राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे महापालिकेला निधी मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यासाठी प्रस्ताव तयार करून मुंबईत पाठपुरावा करण्याची गरज आहे. सध्याचे पदाधिकारी सहा महिने खुर्चीवर बसून आहेत; पण एकदाही मंत्रालयात गेलेले नाहीत. भाजप सरकारमधील काही मंत्र्यांशी आपली चांगली ओळख आहे. त्याचा फायदा तुम्ही करून घेतला पाहिजे. त्यासाठी शासन, नगरविकास खात्याकडे प्रयत्न करावेत. खुर्चीला चिकटून बसू नका, असा सल्ला त्यांनी दिला. (प्रतिनिधी)पाणीपुरवठा खासगीकरणावर चर्चापाणीपुरवठा विभागातील वसुली व इतर कामे खासगी एजन्सीकडे देण्यावरही बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसच्या बहुतांश नगरसेवकांनी या ठरावाला विरोध केला, तर ज्यांनी हा ठराव आणला आहे, त्यांनी त्याचे समर्थनही केले. त्यावर मदन पाटील यांनी गटनेते किशोर जामदार यांना, काय विषय आहे, असे विचारले. जामदार यांनी या विषयाचा आपण अभ्यास केलेला नाही, येत्या दोन दिवसांत अभ्यास करून पार्टी मिटिंगमध्ये सर्व सदस्यांना त्याची कल्पना देऊ, त्यानंतरच सर्वसंमतीने निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. जनाबांची उपस्थितीमदन पाटील यांच्या बैठकीवर इद्रिस नायकवडी गटाने बहिष्कार टाकला होता; पण त्यांचे वडील इलियास नायकवडी मात्र फार्म हाऊसवर उपस्थित होते. त्यांनी मदनभाऊंशी खासगीत चर्चा केली आणि ते बैठकीतून निघून गेले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचाविल्या होत्या. नायकवडी गटाची नेमकी भूमिका काय? अशी चर्चा आज दिवसभर महापालिकेत सुरू होती. गतवेळेसारखा बीओटीचा घोळ नकोबैठकीत बीओटीच्या संभाव्य प्रस्तावावरही चर्चा झाली. मदन पाटील यांनी मागील बीओटीसारखे प्रकार करू नका, अशा स्पष्ट सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेचे उत्पन्न घटले असून, नवे पर्याय शोधावे लागतील. त्यासाठी बीओटी हा एक पर्याय असू शकतो. पण गतवेळेसारखे भूखंड विकून बीओटी नको आहे. कायदेशीर आणि महापालिकेचा जास्तीत जास्त फायदा करून देणारे बीओटी प्रकल्प करण्यास हरकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे एका नगरसेवकाने सांगितले.