शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जत पूर्वच्या द्राक्ष, डाळिंब बागांना टॅँकरचाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 19:26 IST

जत पूर्व भागात यंदाच्या डाळिंब व द्राक्ष हंगामात सुरुवातीपासूनच टँकरने पाणी द्यावे लागत आहे. पूर्वी २० हजार लिटर पाण्याचा टँकर अडीच हजार रुपयांना मिळायचा, तोच टॅँकर सध्या साडेतीन हजार रुपये झाला आहे. दर वाढला असला, तरी बागांना टॅँकरच्या पाण्यामुळे आधार मिळाला आहे.

ठळक मुद्देजत पूर्वच्या द्राक्ष, डाळिंब बागांना टॅँकरचाच आधारखर्चात टॅँकरमुळे दुप्पट वाढ

गजानन पाटील संख : जत पूर्व भागात यंदाच्या डाळिंब व द्राक्ष हंगामात सुरुवातीपासूनच टँकरने पाणी द्यावे लागत आहे. पूर्वी २० हजार लिटर पाण्याचा टँकर अडीच हजार रुपयांना मिळायचा, तोच टॅँकर सध्या साडेतीन हजार रुपये झाला आहे. दर वाढला असला, तरी बागांना टॅँकरच्या पाण्यामुळे आधार मिळाला आहे.पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एकरी खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. द्राक्ष, डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत. उत्पादन काहीच मिळणार नसल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. जत तालुक्यात द्राक्षाचे क्षेत्र ४ हजार ८७० हेक्टर, डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५९ हेक्टर आहे.

तालुक्यात गेल्यावर्षी पाऊस झाला नसल्याने द्राक्ष, डाळिंब बागा अडचणीत आल्या आहेत. यावर्षी पाणी कमी असल्याने पावसाच्या भरवशावर द्राक्ष बागा व डाळिंब बागांचा बहर धरला होता; परंतु परतीचा पाऊस न झाल्याने कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सध्या दरीबडची, सिध्दनाथ, उमदी परिसरातील शेतकरी टॅँकरचे पाणी घालून बागा जगवत आहेत.पूर्व भागातील उमदी, सिध्दनाथ परिसरातील बागायतदार बेदाणा, द्राक्षाचे दर्जेदार उत्पादन घेतो, तर डाळिंबाचे दरीबडची परिसरात दर्जेदार उत्पादन घेतले जाते. पाणी नसल्याने डाळिंब व द्राक्ष बागा अडचणीत आल्या आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे, परंतु पूर्व भागातील ६५ गावे अद्याप पाण्यापासून वंचित आहेत. तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या पाण्याची व चाऱ्यांची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.गेल्या चार वर्षांपासून पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. सध्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथून टॅँकरने पाणी आणून बागांना दिले जात आहे. दरीबडची परिसरातील शेतकऱ्यांना टॅँकर भरायलाही पाणी नाही. कूपनलिका, तलाव शेजारी असलेल्या विहिरीतून पाणी भरले जात आहे. त्यामुळे बागा जगवणे जिकिरीचे बनले आहे.द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना वर्षभर एकरी एक ते दोन लाख खर्च येतो. या खर्चात टॅँकरमुळे दुप्पट वाढ झाली आहे. पाणी पुरेसे नसल्याने उत्पन्नही घटत आहे. बेदाण्याला बाजारात कमी दर मिळत आहे. यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

टॅग्स :WaterपाणीSangliसांगली