शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील वीज ग्राहकांची थकबाकी १९७ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST

सांगली : जिल्ह्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांकडून वीजबिलांचा भरणा नियमित होत होता. दहा महिन्यांपूर्वी दरमहा तीन कोटी ...

सांगली : जिल्ह्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहकांकडून वीजबिलांचा भरणा नियमित होत होता. दहा महिन्यांपूर्वी दरमहा तीन कोटी रुपयांची थकबाकी दिसून येत होती. मात्र, हीच थकबाकी आता तब्बल १९७ कोटी ६२ लाख रुपयांवर गेली आहे. यामुळे महावितरणचे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी थकबाकी वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. तशा नोटीस वीज ग्राहकांना पाठविण्यात आल्या आहेत.

‘कोरोना’च्या दहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी तब्बल १७७ कोटी चार लाखांनी वाढली आहे. ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची रात्रं-दिवस अविरत धडपड सुरु असते, त्यांनाच महावितरणच्या अस्तित्वासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागणार आहे.

जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक असे एकूण सहा लाख ३९ हजार ग्राहक आहेत. मार्च २०१९मध्ये २५ हजार २५० घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे केवळ दोन कोटी १३ लाख रुपयांची थकबाकी होती. मार्च २०२०मध्ये ९६ हजार ६०० वीज ग्राहकांकडे २० कोटी ५९ लाखांची थकबाकी होती. ही थकबाकी वसूल करण्यापूर्वीच मार्चमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाले. तेव्हापासून वीजबिल वसुलीवर मोठा परिणाम झाला आहे. अनलॉकनंतरही थकीत व चालू वीजबिलांचा भरणा फारसा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती सध्या हालाखीची झाली आहे. जिल्ह्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वीज ग्राहकांकडे १९७ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात सर्वाधिक घरगुती दोन लाख २२ हजार ६५० ग्राहकांकडे १३८ कोटी ८८ लाख, वाणिज्यिक ३२ हजार ९५० ग्राहकांकडे ३३ कोटी २१ लाख तर औद्योगिक पाच हजार ९१० ग्राहकांकडे २५ कोटी ५२ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांना नोटीस पाठवून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणकडून सुरु झाली आहे. चालू वीजबिल आणि थकबाकीची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय महावितरणने केली असल्याचे नाळे यांनी सांगितले.

चौकट

महावितरणचे अस्तित्व धोक्यात

देशात सर्वाधिक विजेची मागणी असणारे व २३ हजार ७०० मेगावॅट विजेची मागणी पूर्ण करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. जनतेच्या मालकीच्या महावितरणने देशाच्या वीजक्षेत्रात नावलौकीक मिळवला आहे. परंतु, खासगीकरणाला चालना देणाऱ्या देशव्यापी धोरणात्मक बदलांमध्ये महावितरणचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता वाढली आहे.