शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

१५०० कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: April 3, 2015 23:19 IST

सलग सुट्ट्यांचा परिणाम : एटीएमवर परिणाम नाही

सांगली : सलग सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील सुमारे पाचशे बँकांमधील सुमारे दीड हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. बँकांचा व्यवहार आता सोमवारी सुरु होणार आहे. बँका बंदमुळे एटीएमवर मात्र परिणाम झालेला नाही. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळली आहे. जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका व त्यांच्या शाखांची संख्या १८० असून, व्यापारी, मध्यवर्तीसह खासगी बँकांची संख्या साडेतीनशेहून अधिक आहे. राष्ट्रीय बँकांमधून रोजची शंभर ते दीडशे कोटीची उलाढाल होत असते. इतर बँकांमध्ये रोजची जवळपास दोनशे कोटीची उलाढाल होत असते. काल, गुरुवारपासून विविध कारणांमुळे बँका बंद आहेत. बँकांचे व्यवहार सोमवारपासूनच सुरु होणार आहेत. या चार दिवसांमध्ये दीड हजार कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे.बँकांना सुट्ट्या असल्या तरी, याचा एटीएम सेवेवर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही. सांगली जिल्ह्यामध्ये एटीएममधून जवळपास शंभर कोटीची उचल होत असते. सलग सुट्ट्यांमुळे एटीएममध्ये भरणा करणाऱ्या कंपन्यांकडून यापूर्वीच दोनशे कोटी रुपये अधिक उचलण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसातही एटीएमच्या सेवेवर परिणाम होणार नसल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)

बँक कर्मचारी मात्र रात्रभर कामावर
सलग सुट्ट्यांचा आनंद कर्मचारी लुटू शकले नाहीत. आर्थिक वर्ष संपल्यामुळे गुरुवारपासूनच बँक अधिकारी व कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करीत आहेत. वार्षिक ताळेबंद पूर्ण करण्यासाठी बँकांचे कर्मचारी शनिवारी व रविवारी दिवसभर व रात्री अकरा वाजेपर्यंत बँकेत थांबूनच काम करतील, अशी माहिती बँक अधिकारी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कट्टी यांनी दिली.