शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका क्षेत्रात एलईडीचा उजेड १३५ कोटींच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST

सांगली : महापालिकेच्या एलईडी पथदिव्यांचा प्रकल्प ६० कोटी खर्चाचा असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात यावर १५ वर्षांत ...

सांगली : महापालिकेच्या एलईडी पथदिव्यांचा प्रकल्प ६० कोटी खर्चाचा असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात यावर १५ वर्षांत १३५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. वीज बिलाच्या बचतीमधील ८० टक्के रक्कम ठेकेदाराला द्यावी लागणार आहे. ही रक्कम १०० कोटींवर होते. एलईडीचा उजेड शहरात किती पडणार, हे आताच सांगता येणार नाही; पण सत्तेतील व सत्ताबाह्य काही पदाधिकाऱ्यांवर मोठा ‘उजेड’ पडणार असल्याचेच दिसून येते.

स्थायी समितीने ६० कोटींच्या एलईडी पथदिव्यांची निविदा मंजूर केली. सभापतींसह आठ सदस्यांची मुदत महिन्याअखेरीस संपणार आहे. तत्पूर्वीच निविदा मंजूर करून ‘उजेड’ पाडला आहे. त्यात न्यायालयीन खटला सुरू असून त्याच्या निकालाची प्रतीक्षा करण्यात आलेली नाही. इतकी घाई कशासाठी, असा प्रश्न असला तरी त्यामागील गणिते वेगळी आहेत, हेही समजून आले आहे.

शहरात ३२ ते ३५ हजार पथदिवे आहेत. सध्याचे दिवे बदलून एलईडी दिवे बसविले जाणार आहेत. त्यासाठी ६० कोटींचा खर्च अपेक्षित धरला आहे. वास्तविक निविदा काढताना खर्चाचा आकडा निश्चित न करता बिलात किती बचत होते, याचे गणित मांडण्यात आले. जो ठेकेदार जादा बचत करील, त्याला ठेका देण्याचा निर्णय घेतला. सध्या मंजूर निविदाधारकाने ८४.५ टक्के बिलाची बचत करण्याची हमी दिली आहे. यातून ठेकेदाराला रक्कम दिली जाणार आहे. १५ वर्षे पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे बंधन आहे.

सध्या महापालिकेला वर्षाकाठी नऊ कोटींच्या आसपास वीज बिल येते. बिलात ८४.५ टक्के बचत होईल. त्यामुळे महापालिकेला १५ टक्केच बिल येईल, म्हणजे वर्षाकाठी दीड कोटीचे बिल येईल. बचतीपैकी पाच टक्के रक्कम म्हणजे ४० ते ५० लाख रुपये महापालिकेला मिळतील. उर्वरित सात कोटी रुपये ठेकेदाराला द्यावे लागतील. १५ वर्षांचा हिशेब करता ही रक्कम १०० कोटींच्या घरात जाते. यात ठेकेदाराचा १५ वर्षांचा देखभाल-दुरुस्ती, गुंतवणुकीचे व्याज व बंद दिवे बदलण्याचा खर्च वजा केला तरी महापालिकेला किमान ५० ते ६० कोटींचा जादा झटका बसणार आहे. यावरून नेमका उजेड महापालिका क्षेत्रात पडणार की आणखी कुठे, याचा अंदाज येतो.

चौकट

प्रकल्पाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष खर्चात मोठी तफावत

देखभाल-दुरुस्तीच्या खर्चासह यावर सुरुवातीला २५ ते ३० कोटींपर्यंत खर्च होतील. उपनगरे, विस्तारित भागांत नवीन पोल उभारणे, विद्युतवाहिन्या टाकण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. ठेकेदार केवळ दिवे बसवून देणार. ते बंद पडल्यास ४८ तासांत बदलून देणार. तसे न केल्यास ठेकेदाराला दंड भरावा लागणार आहे.