शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

सांगली जिल्ह्यात ८२ गावांतील १०२ पाण्याचे नमुने दूषित, जिल्हा परिषदेकडून अहवाल प्रसिद्ध

By अशोक डोंबाळे | Updated: October 8, 2022 18:43 IST

जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला पाणी शुद्धिकरणाच्या नोटिसा दिल्या

सांगली : जिल्हा परिषदेकडून सप्टेंबर २०२२ मध्ये घेतलेल्या पाणी नमुन्यांमध्ये जिल्ह्यातील ६९९ गावापैकी ८२ गावांमधील १०२ पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेन ग्रामपंचायतीला पाणी शुद्धिकरणाच्या नोटिसा दिल्या आहेत. तसेच काही गावांमधील पाण्याचे नमुने वारंवार दूषित येत असल्यामुळे त्यांना दूषित पाण्याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्ह्यातील एक हजार १८४ ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये वाळवा तालुक्यातील २०६ ठिकाणीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, २३ गावांतील २७ पाणी नमुने दूषित आले आहेत. यामध्ये साखराळे, गौडवाडी, बागणी, भडकंबे, रोझावाडी, शिगाव, पडवळवाडी, इटकरे, कुंडलवाडी, बहादूरवाडी, पोखर्णी, कारंदवाडी, डोंगरवाडी, करंजवडे, शेखरवाडी, केदारवाडी, खरातवाडी, विठ्ठलवाडी, बेरडमाची, किल्ले मच्छिंद्रगड, नरसिंगपूर, रेठरेहरणाक्ष, शिरटे या गावातील दूषित पाण्याचे प्रमाण १३.१ टक्के आहे.शिराळा तालुक्यातील धसवाडी, फुपेरे, अस्वलेवाडी, कोकरूड, मालेवाडी, बेलेवाडी, खिरवडे, मोरेवाडी, औढी, तडवळे, बिऊर, खेड, करमाळे, भटवाडी, इंगरूळ, भागाईवाडी, आदी २४ गावांमध्येही १३ टक्के दूषित पाण्याचे प्रमाण आहे. आटपाडी तालुक्यातील दिघंची, आवळाई, वाक्षेवाडी, कानकात्रेवाडी, पारेकरवाडी, करुंदवाडी, झरे, विभूतवाडी आणि जत तालुक्यातील मेंढेगिरी, कुडणूर बागेवाडी, येळवी आणि गुळवंची या गावामध्येही दूषित पाणी आढळून आले आहे. मिरज तालुक्यातील १७, तासगाव ४, खानापूर ४ आणि कडेगाव तालुक्यांत पाच गावांमध्ये दूषित पाणी आढळून आले असून, तेथील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दूषित गावांची तालुकानिहाय संख्यातालुका - गावे - दूषित नमुने संख्याआटपाडी - ८  - १२जत - ५  - ५मिरज - १७  - २०तासगाव - ४  - ४वाळवा - २३ - २७शिराळा - १६ - २४खानापूर - ४  - ५कडेगाव - ५ -  ५एकूण - ८२ -  १०२

ग्रामपंचायतींनी जनतेला शुद्ध पाणी देण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्याची गरज आहे. पाणी शुद्धिकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या त्रुटीही दर्जेदार वापरण्याची गरज आहे. वारंवार दूषित पाण्याचे नमुने आलेल्या ग्रामपंचायतींनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. - विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीzpजिल्हा परिषद