शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात ८२ गावांतील १०२ पाण्याचे नमुने दूषित, जिल्हा परिषदेकडून अहवाल प्रसिद्ध

By अशोक डोंबाळे | Updated: October 8, 2022 18:43 IST

जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला पाणी शुद्धिकरणाच्या नोटिसा दिल्या

सांगली : जिल्हा परिषदेकडून सप्टेंबर २०२२ मध्ये घेतलेल्या पाणी नमुन्यांमध्ये जिल्ह्यातील ६९९ गावापैकी ८२ गावांमधील १०२ पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेन ग्रामपंचायतीला पाणी शुद्धिकरणाच्या नोटिसा दिल्या आहेत. तसेच काही गावांमधील पाण्याचे नमुने वारंवार दूषित येत असल्यामुळे त्यांना दूषित पाण्याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्ह्यातील एक हजार १८४ ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये वाळवा तालुक्यातील २०६ ठिकाणीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, २३ गावांतील २७ पाणी नमुने दूषित आले आहेत. यामध्ये साखराळे, गौडवाडी, बागणी, भडकंबे, रोझावाडी, शिगाव, पडवळवाडी, इटकरे, कुंडलवाडी, बहादूरवाडी, पोखर्णी, कारंदवाडी, डोंगरवाडी, करंजवडे, शेखरवाडी, केदारवाडी, खरातवाडी, विठ्ठलवाडी, बेरडमाची, किल्ले मच्छिंद्रगड, नरसिंगपूर, रेठरेहरणाक्ष, शिरटे या गावातील दूषित पाण्याचे प्रमाण १३.१ टक्के आहे.शिराळा तालुक्यातील धसवाडी, फुपेरे, अस्वलेवाडी, कोकरूड, मालेवाडी, बेलेवाडी, खिरवडे, मोरेवाडी, औढी, तडवळे, बिऊर, खेड, करमाळे, भटवाडी, इंगरूळ, भागाईवाडी, आदी २४ गावांमध्येही १३ टक्के दूषित पाण्याचे प्रमाण आहे. आटपाडी तालुक्यातील दिघंची, आवळाई, वाक्षेवाडी, कानकात्रेवाडी, पारेकरवाडी, करुंदवाडी, झरे, विभूतवाडी आणि जत तालुक्यातील मेंढेगिरी, कुडणूर बागेवाडी, येळवी आणि गुळवंची या गावामध्येही दूषित पाणी आढळून आले आहे. मिरज तालुक्यातील १७, तासगाव ४, खानापूर ४ आणि कडेगाव तालुक्यांत पाच गावांमध्ये दूषित पाणी आढळून आले असून, तेथील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दूषित गावांची तालुकानिहाय संख्यातालुका - गावे - दूषित नमुने संख्याआटपाडी - ८  - १२जत - ५  - ५मिरज - १७  - २०तासगाव - ४  - ४वाळवा - २३ - २७शिराळा - १६ - २४खानापूर - ४  - ५कडेगाव - ५ -  ५एकूण - ८२ -  १०२

ग्रामपंचायतींनी जनतेला शुद्ध पाणी देण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्याची गरज आहे. पाणी शुद्धिकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या त्रुटीही दर्जेदार वापरण्याची गरज आहे. वारंवार दूषित पाण्याचे नमुने आलेल्या ग्रामपंचायतींनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. - विजयसिंह जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीzpजिल्हा परिषद