शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

मुलं सारखे हट्ट का करतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 11:51 IST

पालक आपला वेळ न देता, वस्तू द्यायला लागले तर मुलं तेच मागणार!

ठळक मुद्देमुलांचे मित्र होणं अवघड असलं तरी एकमेकांशी खुलेपणानं बोला तरी!

-योगिता तोडकरअजिंक्यचे वडील माझ्याकडे आले, ते सांगत होते कॉलेजमध्ये गेल्यापासून अजिंक्यचं वागणं पार बदलून गेलय. तो रोज नवीन वस्तू मागत असतो. आता तर त्याच्या इतर मित्रांप्रमाणे एक भव्य फ्लॅट घेऊ म्हणून मागे लागलाय. त्यांना शक्य होतं, तर आपल्याला का नाही असे काहीतरी प्रश्न विचारून भंडावून सोडतो. आम्ही दोघे ऑफिसमधून घरी आलो की याची भुणभुण सुरुच. त्याला रोज या नाही त्या प्रकारे समजावतो पण विशेष काही बदलच नाही. कामाचा ताण त्यात  घरी येताच चिरंजीव असे मागण्या करतात.  वैतागून गेलोय अगदी. त्यानंतर अजिंक्यशी व त्याच्या वडिलांशी स्वतंत्न चर्चा केल्यावर काही ठळक गोष्टी निदर्शनास आल्या. अजिंक्यचे आई व वडील नोकरी करतात. त्यामुळे तो आजी आजोबांनाबरोबर वाढला. आठवड्यातून एकदा ते फिरायला, जेवायला जातात, एवढाच वेळ ते एकत्न घालवतात. मग अजिंक्यासारखी मुलं घराबाहेर जास्त वेळ घालवू पाहतात. त्यांना आकर्षित करतील अशा अनेक गोष्टी बाहेरच्या जगात असतात. जिथे ते रमतात. त्यांना नवीन अनुभव घ्यावेसे वाटतात. त्यात मग त्यांना नवीन मित्न मैत्रिणी भेटत असतात. घरी कोणी वेळ द्यायला नसल्याने या मंडळींबरोबर जास्त वेळ घालवायला सुरवात होते. जास्त वेळ एकत्न घालवल्याने मित्न मंडळींचे विचार आपलेसे वाटू लागतात. आणि  त्यानुसार निर्णय प्रक्रि या चालू होते. सुरवातीला आपल्याला वाटतं, व्हायचंच. हे असं वागणं बोलणं, वयच तसं असतं. हळू हळू मुलं सैरभैर व्हायला लागली कि मग आपण याचा गंभरतीने विचार करायला लागतो. आपल्या मुलांच्या वागण्यात, विचारप्रक्रियेत निर्णयप्रक्रियेत बदल होण्याची आपण वाट का पाहावी?मुळात आपल्या मुलांमध्ये व आपल्यामध्ये जवळीकतेचे संबंध हवेत.  त्यांच्यात व तुमच्यात सुसंवाद हवा. आपल्या घराची व त्यांना उपयोगी पडणारी मूल्य यांची ओळख तुम्ही त्यांना करून द्यायला हवी. आपण मुलांना किती व कसा वेळ देतो हे महत्वाचं म्हणूनच असतं.त्याचप्रमाणेआपल्या मुलांच्या मित्न मैत्रिणींची ओळख करून घ्यावी. त्यांना आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवावेत. या गोष्टींमुळे आपली मुलं कोणामध्ये वावरतात त्यामुळे आपल्या मुलांमध्ये काय बदल घडू शकतील, त्याला आपण कशी दिशा देऊ शकू हे लक्षात येते. मुलांना मित्न निवडायचं स्वातंत्र्य नक्की द्या, त्या निवडी स्वीकारा, त्याचा आदरदेखील करा. त्याबरोबरीने मित्न कसे निवडावेत त्यांच्याबरोबर नाते संबंध कसे ठेवावेत हेही समजावून सांगा. नात्याबरोबर भरकटणे आणि ते जपणे यातला फरक समजावून सांगा. म्हणजे कोणतेही निर्णय घेताना मित्न मैत्रिणीच्या प्रभावापेक्षा त्याच्या स्वतर्‍च्या विचारांचा प्रभाव जास्त असेल .    या वयात तुम्ही खरोखर मुलांचे मित्नमैत्रिणी बना, म्हणजे एक मित्न त्याच्यासाठी जे करतो ते सगळं करा त्यामुळे  मुलांच्या विचारांना, निर्णयांना व वर्तनाला योग्य दिशा मिळू शकेल.( लेखिका समुपदेशक आहेत.)