शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ पहिला आला, मग तुला काय धाड भरली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 17:07 IST

घारीची नजर आणि हाती चाबूक घेऊन धावण्यापेक्षा...

ठळक मुद्देमुलांचे काही प्रश्न असतील, तर त्याचे उत्तर नंतर द्या, पण ते काय सांगताहेत ते आधी ऐकून घ्या.तू अभ्यास केला ना, तर तुला चॉकलेट देईन. परीक्षेत चांगले मार्कस मिळवलेस तर मोबाईल घेऊन देईन.. अशा प्रकारची लाच मुलांना कधीच देऊ नका.‘तुला कधीच, काहीच जमणार नाही’ असं त्याचं खच्चीकरणही मुलांसाठी अतिशय हानीकारक.

- मयूर पठाडेतुम्हीच सांगा मुलांनी काय काय करावं?.. त्यांनी शाळेत जावं, क्लासला जावं, खेळायला जावं, संगीत, चित्रकला वगैरे तर त्याला यायलाच हवं, परीक्षेत किमान पहिल्या तिघांत तरी त्यानं असायलाच हवं.. तिसºया चौथ्या क्रमांकावर तो असेल तर मग दुसरा का नाही? पहिला का नाही?.. एकाच वेळी हजार गोष्टी त्यांनी कराव्या असं तुम्हाला वाटतं की नाही? शिवाय वर तुम्हीच म्हणता ना, दिवसभर इतकं काय काय करीत असतो, थकतो अगदी बिचारा... तरीही मग हे कर, ते करं.. असं प्रेशर त्यांच्यावर कशासाठी?मुलांच्या मागे चाबूक घेऊन धावण्यापेक्षा आणि त्यांच्यावर सतत घारीची नजर ठेवण्यापेक्षा काही गोष्टी आपणही समजून घेतलेल्या बºया..पालक म्हणून न करण्याच्या काही गोष्टी१- मुलांना कधीही दूर लोटू नका. म्हणजे तुम्ही कितीही कामात असला तरी त्यांची तुम्हाला ‘कटकट’ वाटू देऊ नका. भले, त्यांचे काही प्रश्न असतील, तर त्याचे उत्तर नंतर द्या, पण ते काय सांगताहेत ते ऐकून घ्या,२- मुलांना लाच देण्याची सवय स्वत:ला लावू नका. म्हणजे तू अभ्यास केला ना, तर तुला चॉकलेट देईन. परीक्षेत चांगले मार्कस मिळवलेस ना, तर तुला मोबाईल घेऊन देईन.. ही एक प्रकारची लाच आहे.३- ही लाच घेण्याची सवय जर का मुलांना लागली, तर या फसव्या मोहजालातून ते कधीच बाहेर येऊ शकणार नाहीत. त्यांच्या आयुष्याची गाडीच यामुळे रुळावरून घसरू शकते.४- मुलांना लाच देण्याची एक बाजू, तर दुसरीकडे ‘तुला कधीच, काहीच जमणार नाही’ असं त्याचं खच्चीकरण करणं. या दोन्हीही गोष्टी अतिशय वाईट. त्यापासून पालकांनी कायम दूर राहायला हवं.बघा, जमतं का तुम्हाला या गोष्टींपासून दूर राहाणं..