शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील भाजी विक्रेत्याचा राजापूर येथे अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:41 IST

राजापूर : रस्त्याच्या बाजूला जेवण करण्यासाठी बसलेल्या कुटुंबांवर कंटेनरचा फाळका पडून झालेल्या अपघातात भाजी विक्रेते निखिल पोपट साळुंखे (वय ...

राजापूर : रस्त्याच्या बाजूला जेवण करण्यासाठी बसलेल्या कुटुंबांवर कंटेनरचा फाळका पडून झालेल्या अपघातात भाजी विक्रेते निखिल पोपट साळुंखे (वय ३२, रा. आष्टा, सांगली) हे जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असणाऱ्या नकुशा प्रकाश मासाळ (रा. सांगली) या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर गंगा तिठा येथे बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमाराला झाला.

या अपघाताची माहिती उज्ज्वला भारत सरगर (२५) यांनी पाेलिसांना दिली. राजापूर गंगा तिठा येथे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील भाजी विक्रेते कुटुंब जेवण करण्यासाठी महामार्गाच्या बाजूला बसले होते. याच दरम्यान महामार्गावर गोव्याकडून मुंबईकडे जाणारा कंटेनर (एचआर ५५, वाय ६१०८) चालला होता. हा कंटेनर कादीर शौकत अली (३६, रा. तिलजा, ता. समरीयाना, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश) हा चालवीत होता. भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला आणि उन्हाळे येथील अवघड वळणावर कंटेनरला अपघात झाला. त्यावेळी कंटेनरचा फाळका तुटला व तेथे तो जेवत असलेल्या कुटुंबाच्या अंगावर जाऊन पडला. अचानक घडलेल्या प्रकाराने जेवत असलेल्या मंडळींना आजूबाजूला पळण्याचीही संधी मिळाली नाही. त्या फाळक्याच्या माराने भाजी विक्री करणारे निखिल पोपट साळुंखे हे जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत असणाऱ्या नकुशा प्रकाश मासाळ गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या उजव्या पायाला फॅक्चर झाले आहे.

अपघातानंतर पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले हाेते. त्यावेळी निखिल साळुंखे हे मृत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचालक कादीर शौकत अली याच्यावर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वेंगुर्लेकर अधिक तपास करीत आहेत.

...........................................

अनेक वर्ष विना अपघात प्रवास

नकुशा या गेली अनेक वर्ष सांगली येथून स्वतः बोलेरो पिकअप भाजी भरून घेऊन कोकणात येऊन त्याची विक्री करतात. त्या स्वतः गाडी चालवितात. त्यांनी गेल्या अनेक वर्षांत कधीही अपघात केलेला नाही. मात्र, या विचित्र अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारार्थ कोल्हापूरकडे हलविण्यात आले आहे. कंटेनर चालक कादीर शौकत अली याला रत्नागिरीमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

...................................

दाेन दिवसांपूर्वी राजापुरात

सांगलीतील हे कुटुंब भाजी विक्रीसाठी काेकणात येतात. राजापूर येथे दाेनच दिवसांपूर्वी ते भाजी विक्रीसाठी आले हाेते. सायंकाळी काम आटाेपून ही मंडळी सांगलीकडे जाण्यासाठी निघाली हाेती. मात्र, रात्र झाल्याने त्यांनी येथेच जेवण उरकून जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते रस्त्याच्या बाजूला बसले हाेते. मात्र, रस्त्यावरून जाणारा कंटेनर त्यांच्यासाठी काळ बनून आला आणि त्यातच ही दुर्दैवी घटना घडली.