शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
3
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
4
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
5
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
6
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
7
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
8
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
9
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
10
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
11
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
12
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
13
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
14
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
15
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
16
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
17
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
18
पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप, पण भारतीय मार्केटवर झाला नाही परिणाम, 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
Swapna Shastra: प्रिय व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू पाहणे शुभ की अशुभ? त्यातही स्वप्नं पहाटेचं असेल तर?
20
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले

व्हर्जीन कोकोनट ऑइलचा वापर आरोग्यदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क साधारणपणे १० ते ११ महिन्यांच्या नारळ खोबऱ्याच्या किसापासून दूध काढून ते शिजवल्यानंतर जे तेल प्राप्त होते, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

साधारणपणे १० ते ११ महिन्यांच्या नारळ खोबऱ्याच्या किसापासून दूध काढून ते शिजवल्यानंतर जे तेल प्राप्त होते, त्याला व्हर्जीन कोकोनट ऑइल म्हणतात. नारळाच्या खोबऱ्यापासून काढण्यात येणाऱ्या तेलापेक्षा हे तेल मात्र भिन्न असते. यामध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. शिवाय हे तेल नैसर्गिक सर्वश्रेष्ठ लार्विक आम्लाचा स्रोत आहे.

व्हर्जीन कोकोनट ऑइल हे एक गुणवंत तेल मानवाच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा भाग असून, ते जीवनाचा विविध अवस्थेमध्ये विविध प्रकारे उपयोगात आणले जाते. तेल म्हटले की, सोयाबीन, भुईमूग, मोहरी, तीळ, करडई अथवा कापूस (सरकी) तत्सम घटकांपासून बनविलेले असते आणि त्याचा आहारात वापर केला जातो; परंतु नारळापासून तयार केलेले व्हर्जीन कोकोनट ऑइल अत्यंत बहुगुणी आणि बहुपयोगी तेल आहे.

कल्पवृक्ष म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग मनुष्य प्राण्यासाठी मौल्यवान आहे. नारळापासून तयार केलेल्या खाद्यपदार्थाला जगात ‘सुपर फूड’ म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. अलौकिक अशा नारळापासून मिळणाऱ्या फॅटी ॲसिडचा उपयोग आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे.

व्हर्जीन कोकोनट ऑइल तेलाचे आहारातील महत्त्व जवळपास सर्वच देशातील शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. त्याचे महत्त्व आता लोकांना माहीत झाल्यानेच व्हर्जीन कोकोनट ऑइल या तेलाचा उपयोग मानवी जीवनात करण्यात येत आहे. त्याचे खाद्य व अखाद्य पदार्थात वर्गवारी केलेली आहे. खाद्यपदार्थ वर्गवारीमध्ये, व्हर्जीन कोकोनट ऑइल हे आहारातील महत्त्वाचा ऊर्जा स्रोत आहे. हे स्वयंपाकात पदार्थ तळण्यासाठी वापरले जाते. ज्यामध्ये अपवादात्मक अशी खवटपणा प्रतिकारशक्ती असून, ते आहाराचे स्वाद वाढविण्यास मदत करतात, तसेच त्याच्या न बदलण्याच्या विशिष्ट अशा लवचिकता गुणधमार्मुळे त्याचा वापर चीज व आइस्क्रीममध्ये पर्यायी केला जातो. अखाद्य पदार्थ वर्गवारीमध्ये, त्वचा व केसांना लावण्यासाठी वापर, ॲरोमाथेरपी व मसाज ऑइल म्हणून वापर व सौंदर्यवर्धक आणि त्वचेस उपयुक्त म्हणून वापर केला जातो. नारळ पाणी रुग्णांना देण्याचा डॉक्टर सल्ला देतात तशाचप्रकारे आता व्हर्जीन कोकोनट ऑइलसुद्धा नारळ पाण्यापेक्षा उपयुक्त ठरत आहे. व्हर्जीन कोकोनट ऑइलमध्ये जीवाणू प्रतिबंधक, विषाणू प्रतिबंधक व रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारे गुणधर्म उपलब्ध आहेत.

- डॉ. वैभव शिंदे, अधिष्ठाता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र,

भाट्ये- रत्नागिरी.

रक्तदाब नियंत्रणात

नारळ पाण्यामुळे पोटातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ यासारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. शरीरास ऊर्जा प्राप्त होत अशक्तपणा, थकवा, चक्कर समस्यांतून सुटका होते. नारळ पाण्यात ‘क’ जीवनसत्त्व, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती

नारळ पाणी सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो. नारळाचे पाणी सकाळचे सेवन अधिक चांगले मानले जाते. यावेळी मानवी शरीर सर्व पोषक द्रव्य शोषून घेते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. नारळाच्या पाण्याने चेहरा धुतल्यामुळे टॅनिंग कमी होते आणि चेहरा थंड राहतो.

विविध पोषक घटकांनी युक्त

नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट, पोटॅशियम, लोह मॅगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक असतात. नारळ पाण्यामध्ये ९४ टक्के पाणी असते. त्यात चरबीचे प्रमाण खूप कमी आहे. २५० मि.लि. नारळाच्या पाण्यात कार्बाचे प्रमाण-९ ग्रॅम, फायबर-३ ग्रॅम, प्रथिने-२ ग्रॅम, व्हिटॅमिन सी- १० टक्के, मॅग्नेशियम-१७ टक्के, सोडियम- ११ टक्के, कॅल्शियम- ६ टक्के असते.