शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
4
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
5
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
6
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
7
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या
8
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
9
"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना
10
हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ
11
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
12
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
13
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
14
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
15
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
16
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
17
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
19
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
20
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!

वर्षभरात वृक्ष निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:32 AM

झाडांचे व मानवाचे अतूट नाते असले, तरी मानव आपल्या स्वार्थासाठी वृक्षतोड करत आहे. त्याच्या विपरित परिणामाला सामोरे जावे ...

झाडांचे व मानवाचे अतूट नाते असले, तरी मानव आपल्या स्वार्थासाठी वृक्षतोड करत आहे. त्याच्या विपरित परिणामाला सामोरे जावे लागत आहे. त्यावर उपाय म्हणून वृक्ष लागवड करणे अपेक्षित आहे. एखादे बीज रूजवले की त्याचे रोप बनते. त्यासाठी सुयोग्य जमीन, खत आणि पाणी यांची आवश्यकता असते. झाड ऑक्सिजन निर्मिती करते. तो ऑक्सिजन माणसाला जगण्यासाठी खूपच आवश्यक आहे. निसर्गचक्रात शुध्द हवेची कमतरता झाडे भरून काढतात. झाडांचे महत्त्व लक्षात घेता, वृक्षतोड थांबवून नवीन वृक्ष लागवडीसंदर्भात योग्य पाऊल उचलले पाहिजे, नव्हे तर कृती करणे गरजेचे आहे. पैकी महत्त्वपूर्ण झाडे खालीलप्रमाणे :

अशोक : अशोक वृक्ष लागवड रस्त्याकडेला, बागेसह घरासभोवतीच्या सुशोभिकरणासाठी केली जाते. अशोकाचे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करून पर्यावरणात सोडते. केवळ ऑक्सिजनचे प्रमाण वाढवत नाही, तर अशोकाचे झाड दूषित गॅस शुध्द करण्याचे काम करते.

नारळ : नारळाची लागवड बागेत किंवा घरे- हॉटेलभोवती केली जाते. नारळाचे झाड उत्पन्न देत असले, तरी हवेतील कार्बनडायऑक्साईड शोषून घेतो. जमिनीतील कार्बनचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपिकता वाढविण्याचे काम झाड करते.

जांभूळ : जांभळाची लागवड बियांपासून रोपे तयार करून तसेच पॅच पध्दतीने डोळे भरून अभिवृध्दी करता येते. जांभळाचे झाड सल्फर आणि नायट्रोजनसारख्या गॅसेसला शुध्द करते. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करते. शिवाय फळामध्ये महत्त्वपूर्ण औषधी गुणधर्म आहेत.

कडुनिंब : रस्त्यांच्या दुतर्फा, मोकळया जागेवर कडुनिंबाची लागवड करावी.

अनेक औषधी गुणांनीयुक्त असून, ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्याचे काम करते. पानात बुरशीनाशक व जंतुनाशक गुण आहेत.

- डॉ. वैभव शिंदे, कृषिविद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये, जि. रत्नागिरी

गिरीपुष्प

पावसाच्या पाण्यावर सहज वाढणारी झाडे शेताच्या कडेला लावल्याने हवा शुध्दीकरण करतात. तसेच गिरीपुष्प वनस्पतीचा पाला शेतात टाकल्यास पिकाला त्यापासून नत्र, स्फुरद मिळते.

पीक उगवल्यानंतर सरीमध्ये गिरीपुष्पाचा पाला टाकल्यास जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.

लागवड पध्दत

कोणत्याही रशीत साल असलेल्या वृक्षाची १०-१२ फूट लांबी व २०-२५ सेंमी व्यासाची फांदी अलगदपणे काढून ९० लि. पाण्यात ९ किलो शेणाचे द्रावण तयार करून बुडवून ठेवावी. दोन फुटाच्या खड्ड्यात लागवड करावी. अशाप्रकारे वर्षभरात १० फूट उंचीचे सावली तसेच भरपूर ऑक्सिजन देणारे वृक्ष तयार होतील.